शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

एकाधिकारशाही मोडून काढा; अजित पवार यांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 06:30 IST

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात तिन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन

नवी मुंबई : नवी मुंबईतील एकाधिकारशाहीला घाबरण्याचे कारण नाही. आता तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे रखडलेली सर्व विकासकामे मार्गी लागतील, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला जाईल याचे संकेत दिले.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्यांच्या माध्यमातून देशात धार्मिक भेद निर्माण केला जात असल्याने महाविकास आघाडीची सत्ता आहे, तोपर्यंत महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पहिल्या मेळाव्यात ते बोलत होते.या वेळी माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार राजन विचारे आदी प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्याच्या हितासाठी वेगवेगळ्या विचारधारेचे तीन पक्ष एकत्र आले आहेत. हे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिन्ही पक्षांची काम करण्याची व समजावण्याची पद्धत वेगळी आहे. नवी मुंबईतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पवार यांनी या वेळी दिली. शिवभोजन योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात या योजनेचा विस्तार करण्याचा राज्य सरकारचा विचार असून आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतूद करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे सरकार समान कार्यक्रमावर चांगले काम करीत आहे. दोन महिन्यांत अनेक क्रांतिकारक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. येत्या काळात नवी मुंबई शहराचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे. येथील अनेक प्रलंबित प्रश्न निकाली काढायचे आहेत. त्यामुळे येऊ घातलेली महापालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे. येथील राजकीय मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाल्याचे ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.

या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते, नगरसेवक उपस्थित होते. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे प्रभारी शशिकांत शिंदे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे अनिल कौशिक, रमाकांत म्हात्रे, शिवसेनेचे विठ्ठल मोरे, महापलिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी उपस्थित होते.

‘मी पुन्हा येईन’ विधानाची खिल्ली

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. त्यांना आताही परत येण्याचे स्वप्न पडत आहे. मात्र आम्ही तिघे एकत्रित आहोत तोपर्यंत हे शक्य नाही, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक काळातील ‘मी पुन्हा येईन’ या विधानाची खिल्ली उडविली.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाGanesh Naikगणेश नाईकElectionनिवडणूक