शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ पनवेल’ची घोषणा विरली हवेत

By admin | Updated: November 28, 2014 00:25 IST

व्यापारी आणि सोन्याच्या पेढय़ांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेलला सध्या अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे.

पनवेल : व्यापारी आणि सोन्याच्या पेढय़ांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेलला सध्या अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कामगार इतर विभागांत वळविण्यात आल्याने शहरातील सफाईचा बोजवारा उडाला आहे. आधीच मनुष्यबळाची कमतरता आणि त्यात कामगारांची सुट्टीच्या निमित्ताने लागणारी अनुपस्थिती यामुळे ‘स्वच्छ पनवेल.. सुंदर पनवेल’ ही घोषणा हवेत विरली आहे. 
शहराचा विस्तार वेगाने होत आहे. या ठिकाणी लहान - मोठे मिळून सुमारे 5क् किलोमीटरचे रस्ते आहेत, त्याचबरोबर बाजारपेठ, शासकीय कार्यालय, भाजी व मासळी मार्केट, शोरुम, वेगवेगळी दुकाने या शहरात आहेत. पनवेल नगरपालिका दीड वर्ष जुनी असून ती अ दर्जाची आहे. शहरवासीयांना पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच या परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. आरोग्य विभागावर मोठी जबाबदारी आहे, मात्र एकीकडे ‘स्वच्छ पनवेल.. सुंदर पनवेल’चा नारा देणा:या सत्ताधारी आणि प्रशासनाला त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. फक्त सभेत ‘इथे कचरा राहिला, तिथे उचलला नाही, आरोग्य निरीक्षक काय करतात’ असे प्रश्न आणि टीका करण्याचेच काम नगरसेवक करतात. या खात्यात किती मनुष्यबळ आहे, याचे ऑडिट कोणी केलेले नाही. शहरात ज्यावेळी विशेष मोहिमा राबविण्यात येतात. खासगी ठेकेदारांचे कामगार घेतले जातात. प्रशासनाचे लाखो रुपये खर्च होत असून त्याबद्दल कोणाला काही पडलेले नाही. इतर विभागांनाही  कामगार मिळल्यामुळे ते मूग गिळून गप्प बसलेले दिसून येतात. 
 
सहाय्यक मुकादमपद 
निर्माण कोणी केले?
आरोग्य विभागात साफसफाई करण्याकरिता सहा टीम आहेत. त्यामध्ये एका मुकादमाची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असतानाही काही अधिका:यांनी आपल्या मर्जीतील कामगारांना सहाय्यक मुकादम म्हणून स्वयंघोषित बढती दिली. ही मंडळी सफाईचे काम करीतच नाही. फक्त मुकादमगिरी करतात. त्यामुळे सहाय्यक मुकादम हे पद निर्माण कोणी केले, असा सवाल उपस्थित होत आहे. या व्यतिरिक्त नऊ कामगार असे आहेत की ते सफाईच्या कामाला हातच लावत नाहीत.
 
शहरात जमा होणा:या कच:याची खासगी एजन्सीच्या माध्यमातून विल्हेवाट लावणो, रस्ते व सार्वजनिक ठिकाणावरील स्वच्छता हे आरोग्य खात्याचे काम आहे. त्यासाठी एकूण 225 सफाई कामगार आणि चार आरोग्य निरीक्षक आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हे मनुष्यबळ कमी आहे. असे असतानाही या विभागातील 29 सफाई कामगार फायर ब्रिगेड, एक खिडकी, प्रशासन, स्वागतकक्ष, जन्ममृत्यू नोंद, कर या ठिकाणी पाठविण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षापासून हे कामगार आरोग्य विभागाकडे येतच नाहीत. त्यामुळे आज फक्त 184 कामगार आरोग्य खात्याकडे उरले असून त्यापैकी काही सुट्टी, दांडय़ा किंवा इतर कारणामुळे गैरहजर राहतात. हे बळ शहराच्या साफसफाईकरिता अपुरे आहे. 
 
पालिकेचा आरोग्य विभाग त्याचबरोबर इतरत्र कामगार आणि कर्मचा:यांची संख्या कमी आहे. नवीन पदे भरण्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिका:यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर नवीन भरती करण्यात येईल.
- मंगेश चितळे, मुख्याधिकारी, पनवेल नगरपालिका.