शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पुलाच्या कामाच्या चौकशीसाठी समिती नेमा!

By admin | Updated: December 8, 2014 23:53 IST

तडे गेल्यामुळे आता या कामाची शासकीय समिती नेमून चौकशी करावी व त्यात आढळणा:या दोषींवर कारवाई करावी,

ठाणो : घोडबंदरवरून मुंबईकडे जाणा:या आणि सध्या खुल्या न झालेल्या उड्डाणपुलावर काही ठिकाणी वाहतूक सुरू होण्यापूर्वीच तडे गेल्यामुळे आता या कामाची शासकीय समिती नेमून चौकशी करावी व त्यात  आढळणा:या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
या उड्डाणपुलाचे काम मागील नऊ वर्षापासून सुरू असून त्यासाठी पाचपटीने खर्च करीत असताना अतिशय संथगतीने काम सुरू आहे. या कामास आघाडी सरकारचे मंत्री व अधिकारी जबाबदार असून काम पूर्ण झाल्याचा दावा एमएसआरडीसीचे अधिकारी करीत असले तरी सद्य:स्थितीत या पुलाचे काम अपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हा पूल खुला होण्यापूर्वीच त्याला तडे गेले आहेत. परंतु, एमएसआरडीसीचे अधिकारी या पुलामध्ये हायटेंशन वायर टाकत असताना त्याला असलेली प्रिसीव्हिंग वायर तुटली असल्याचा दावा करीत आहेत. 
प्रत्यक्षात या उड्डाणपुलाचे काम तांत्रिकदृष्टय़ा पूर्ण झाले नसून अतिशय निकृष्ट पद्धतीने या पुलाचे काम झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनस्तरावर समिती नेमण्यात यावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे. ती पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 
 
4घोडबंदर येथील रस्ता वाढणा:या वाहनांसाठी अपुरा पडत असल्याने घोडबंदर ते मीरा रोड या दरम्यानच्या रस्त्याचे सहापदरीकरण करून या रस्त्यासोबतच नवीन एलेव्हेटेड रस्ता अथवा भुयारी रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  
 
4या उड्डाणपुलाचे काम मागील नऊ वर्षापासून सुरू असून त्याचा खर्च पाचपटीने वाढला असूनही त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. तरीही काम पूर्ण झाल्याचा दावा एमएसआरडीसीचे अधिकारी करीत आहेत.