शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील रेशन दुकानांचे परवाने रद्द करा, मनसेची मागणी

By admin | Updated: December 8, 2014 23:54 IST

वजनकाटय़ात जाणीवपूर्वक फेरबदल करून नागरिकांना गंडविणा:या शिधावाटप दुकानदारांचा परवाना रद्द करण्याची मागणी मनसेने केली आहे.

उल्हासनगर : वजनकाटय़ात जाणीवपूर्वक फेरबदल करून नागरिकांना गंडविणा:या शिधावाटप दुकानदारांचा परवाना रद्द करण्याची मागणी मनसेने केली आहे. वजनकाटय़ात बनावटगिरी करणा:या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून कमी दिलेले धान्य ग्राहकांना परत करण्याचा इशाराही दिला आहे.  
उल्हासनगरातील शिधावाटप दुकानदारांनी वजनकाटय़ात फेरबदल केल्याप्रकरणी त्यांच्यावर वजनमापे विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. गरीब-गरजू नागरिकांना गंडवणा:या शिधावाटप दुकानदारांवर दंडात्मक कारवाईपेक्षा त्यांचा परवाना रद्द करून कमी दिलेले धान्य नागरिकांना परत करण्याची मागणी मनसेचे जिल्हा संघटक बंडू देशमुख यांनी केली आहे. शिधावाटप कार्यालयाने दुकानदारांवर सक्त कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिल्याने शिधावाटप दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
शहर मनसेने शिधावाटप दुकानदार वजनकाटय़ात फेरबदल करून नागरिकांना कसे फसवितात, याची जनजागृती सुरू केली आहे. या प्रकाराने नागरिकांत असंतोष निर्माण होऊन  शिधावाटप दुकानांतील वजनकाटे तपासण्याची मागणी होत आहे. नोव्हेंबर महिन्यात 16 शिधावाटप दुकानदारांचे वजनकाटे दोषी आढळल्याने वजनमापे कार्यालयाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. यापूर्वी 11 शिधावाटप दुकानांवर कारवाई केल्याची माहिती वजनमापे वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक मधुकर कोचरे यांनी दिली. शहरात शिधापत्रिकाधारक नागरिकांची संख्या 2 लाखांपेक्षा जास्त असून लाखो किलो अन्नधान्याचा अपहार केल्याची टीका होत आहे. अशा दुकानांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री, शिधावाटप विभागासह पोलिसांना निवेदन देणार असल्याची प्रतिक्रिया मनसेचे बंडू देशमुख यांनी दिली आहे. या प्रकाराने सामान्य नागरिकांत असंतोष निर्माण झाला असून शिधावाटप दुकानांतील वजनकाटय़ांची लवकरच तपासणी होणार आहे. 
 
4गरीब-गरजू नागरिकांना गंडवणा:या शिधावाटप दुकानदारांवर दंडात्मक कारवाईपेक्षा त्यांचा परवाना रद्द करून त्यांनी आजवर जेवढे धान्य  कमी दिले ते  नागरिकांना देण्याची  मागणी मनसेचे जिल्हा संघटक बंडू देशमुख यांनी केली आहे. 
4शिधावाटप कार्यालयाने दुकानदारांवर सक्त कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही देशमुख यांनी दिल्याने शिधावाटप दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
 
 वजनकाटय़ात दोष आढळल्यास ते दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी दुकानदाराची आहे.  वजनकाटय़ांची  तपासणी केली असता दोषी 16 दुकानदारांविरोधात कारवाई केली .
- मधुकर कोचरे, निरीक्षक वजनमापे वैधमापनशास्त्र कार्यालय