शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

By admin | Updated: September 29, 2015 00:41 IST

शहरातील २३ विसर्जन तलावांवर रविवारी सकाळपासून गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी करण्यास सुरवात केली होती.

शहरातील २३ विसर्जन तलावांवर रविवारी सकाळपासून गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी करण्यास सुरवात केली होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सातारा, पुणे व इतर ठिकाणांवरून ढोल पथकांना बोलावले होते. सायंकाळी वाशी, नेरूळ,कोपरखैरणे परिसरातील रस्ते गणेशभक्तांनी फुलून गेले होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. पहाटे चारपर्यंत ७,५०८ घरगुती व ५१९ सार्वजनिक गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. वाशीतील शिवाजी चौकामध्ये गणरायांवर महापालिकेच्यावतीने पुष्पवृष्टी करण्यात येत होती. वाशीमध्ये शिवसेनेचे विठ्ठल मोरे, भारतीय जनता पक्ष व इतर सामाजिक संस्थांनी गणेशभक्तांसाठी चहा, अल्पोपहाराची सोय केली होती. शहरातील सर्व तलावांवर विशेष खबरदारी घेण्यात येत होती. अग्निशमन दलाचे जवान व पोहता येणाऱ्या स्वयंसेवकांना तैनात करण्यात आले होते. -स्वयंसेवकांविषयी नाराजीशहरातील काही विसर्जन तलावांवर स्वयंसेवक गणरायाचे विसर्जन करण्यासाठी भाविकांकडून पैशांची मागणी करत होते. ३०० ते ५०० रुपयांची मागणी केली जात होती. मोठ्या मंडळांकडून ५ हजार रुपये मागितले जात होते. याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक स्वयंसेवक चांगले काम करतात परंतु ठरावीक पैशांसाठी अडवणूक करणाऱ्यांमुळे सर्वांची प्रतिमा खराब होत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. ---खाडीत बंदीवाशी खाडीमध्ये यावर्षी मानखुर्दमधील गणरायांना विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. वाशी गावातील फक्त तीन गणेशमूर्तींचेच खाडीत विसर्जन करण्यात आले. -----नेरूळमध्ये एका गणेशमूर्तीचे वजन जास्त असल्यामुळे तराफ्यावर ठेवता येत नव्हती. यामुळे जवळपास तीन तास विसर्जन थांबवावे लागले होते. अखेर क्रेन मागवून गणेशमूर्तीला तराफ्यावर ठेवण्यात आले. पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. यामुळे निर्विघ्नपणे विसर्जन पार पडले. महापौर सुधाकर सोनावणे, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनीही विसर्जन परिसरात मध्यरात्रीपर्यंत उपस्थिती दर्शविली होती.----------वडाळे तलाव , आदई तलाव, कोळीवाडा, गाढी नदीच्या विविध ठिकाणच्या पात्रात, कोपरा तलाव आदी ठिकाणी मोठ्या संख्येत विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पनवेलमध्ये १९७१, नवीन पनवेल २८८९, खांदेश्वर १७८९, कळंबोली ९२०, कामोठे २१०७, खारघर ४३०१ आदी घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागात देखील ३ हजारांपेक्षा जास्त मूर्ती यावेळी विसर्जित करण्यात आल्या. ---------खारघरमध्ये डाँ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने निर्माल्यापासून कपोस्ट खत निर्मितीचा उपक्रम राबविला. शहरातील ३ विसर्जन ठिकाणांवर १२९ स्वयंसेवकांची नेमणूक करुन साडेपाच टन निर्माल्य गोळा करण्यात आले. या निर्माल्यावर प्रक्रिया करुन निर्माल्यापासून तयार होणारे कपोस्ट खत खारघरमध्ये प्रतिष्ठानने केलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी वापरले जाणार आहे.