शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

उंदीर मारण्यासाठी २५ हजारांचा भुर्दंड

By admin | Updated: July 4, 2017 07:14 IST

पालिका प्रशासनासमोर भटक्या कुत्र्यांबरोबर उंदरांचा उपद्रव रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मूषक नियंत्रणाचा पालिकेच्या तिजोरीवरही

नामदेव मोरे/लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पालिका प्रशासनासमोर भटक्या कुत्र्यांबरोबर उंदरांचा उपद्रव रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मूषक नियंत्रणाचा पालिकेच्या तिजोरीवरही भार पडू लागला आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये तब्बल ९२ लाख ३२ हजार रुपये खर्च झाले आहेत. रोज पालिकेच्या तिजोरीतील २५ हजार रुपये यासाठी खर्च झाले असून, वर्षभरामध्ये १ लाख ४३ हजार उंदीर मारल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामधील कारभार दिवसेंदिवस वादग्रस्त होऊ लागला आहे. शहरवासीयांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या नावाखाली प्रत्येक वर्षी १०० कोटीपेक्षा जास्त खर्च केला जात आहे; पण प्रत्यक्ष या पैशांचा योग्य वापर होत नाही. आरोग्यावरील खर्च व्यर्थ होऊ लागला आहे. श्वान व मूषक नियंत्रण कार्यक्रमावरील खर्चही असाच पाण्यात जात आहे. २०१५-१६ वर्षामध्ये श्वान निर्बीजीकरणावर तब्बल १ कोटी ३ लाख रुपये खर्च झाले आहेत. एवढा प्रचंड खर्च करून फक्त ५१०७ श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वास्तविक शहरातील श्वानांची संख्या लक्षात घेता, प्रत्येक वर्षी किमान १२ ते १५ हजार श्वानांवर शस्त्रक्रिया होणे आवश्क आहे; पण निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आलेल्या अपयशामुळे हे उद्दिष्ट साध्य करणे पालिकेला शक्य झालेले नाही. मूषक नियंत्रण कार्यक्रमाच्या बाबतीमध्येही हाच प्रकार होत आहे. आयुक्तांच्या अधिकारामध्ये डिसेंबरमध्ये तब्बल २४ लाख ६७ हजार रुपयांचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे.पालिकेच्या वार्षिक प्रशासन अहवालामध्ये मूषक नियंत्रणाविषयी दिलेली आकडेवारी धक्कादायक आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये मूषक नियंत्रणासाठी ४८५२ पिंजऱ्यांचा उपयोग करण्यात आला. वर्षभर ६ लाख २४ हजार ३३९ बिळे धूरीकरण करण्यात आली व तब्बल १ लाख ४३ हजार २५ उंदीर मारण्यात आले आहेत. उंदीर मारणे, पिंजरे खरेदी व धूरीकरणासाठी तब्बल ९२ लाख ३२ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर ३६५ दिवसांमध्ये रोज सरासरी ३९१ उंदीर मारण्यात आले असून, यासाठी रोज २५२९३ रुपये खर्च करण्यात आले आहेत. उंदरांचा उपद्रव वाढला असल्यास तक्रार कोणाकडे करायची. पिंजऱ्याची किंवा धूरीकरणाची आवश्यकता असल्यास कोणाशी संपर्क साधायचा? याविषयी काहीही माहिती उपलब्ध नसल्याने उंदरांचा त्रास होत असतानाही नागरिकांना वैयक्तिक खर्च करून उपाययोजना करावी लागत आहे. उंदरांमुळे प्रचंड नुकसानशहरामध्ये उंदरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त आहेत. झोपडपट्टीसह विकसित नोडमध्येही उंदरांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोसायटी आवारामध्ये उभ्या वाहनांची वायर कुरतडण्याचे प्रकार नियमित घडत आहेत. कार्यालयातील संगणक व इतर साहित्याची नासधूस होत आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना पालिकेच्या कोणत्या विभागाकडे याविषयी तक्रार करायची व धूरीकरणासह इतर उपाययोजना कोण करते? याविषयी माहिती नागरिकांना नसल्याने नुकसान सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.