शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नरेगाच्या कामांवर २,९१७ मजूर

By admin | Updated: October 1, 2015 01:43 IST

पावसाअभावी जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे बहुतांशी गावपाड्यातील ग्रामीण मजूर नरेगाच्या कामावर जात आहेत

ठाणे: पावसाअभावी जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे बहुतांशी गावपाड्यातील ग्रामीण मजूर नरेगाच्या कामावर जात आहेत. त्यासाठी घेतलेल्या ११० कामांवर दोन हजार ९१७ मजूर काम करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला आहे. उत्पादन अत्यल्प होणार असल्यामुळे शेतकरी त्यावर अधिक खर्च करण्यास धजावत नाही. यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे ते ग्रामपंचायतींसह विविध शासकीय विभागाद्वारे नरेगाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांवर जात आहेत. एप्रिलपासून या कामांवरील मजुरीतही वाढ झाली आहे. या आधी केवळ १६५ रूपये मिळत असत. परंतु, आता १८१ रूपये प्रतिदिन अशी मजुरी मिळत आहे. त्यामुळे या कामांवर मजूर वळताना दिसत आहेत.या कामांवर हजर राहणाऱ्या मजुरांचे वेतन १५ दिवसाच्या आत त्यांच्या बँकेसह पोस्टातील खात्यावर जमा होत असल्याचा दावाही केला जात आहे. संबंधितानाकडून काही वेळा चुकीचा खातेक्रमांक टाकल्या जात असल्याची समस्या निदर्शनात आलेल्या आहेत. यामुळे दुसऱ्याच्या खात्यावर मजुरी जमा होत असल्याचे तक्रारी अधूनमधून येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन सदरची मजुरी पुन्हा संबंधित मजुराच्या खात्यावर वळविली जाते. या प्रक्रियेला मात्र काही दिवसांचा विलंब होतो.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींद्वारे ६२ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यावर एक हजार ५८२ मजूर कार्यरत आहेत. याशिवाय विविध यंत्रणाव्दारे ४८ कामे सुरू केलेली आहेत. त्यावर एक हजार ३३५ मजूर कार्यरत आहेत. यापैकी भिवंडी तालुक्यातील २० कामांवर ३०० मजूर आहेत, शहापूर ३८ कामे ११२८ मजूर असून कल्याणमध्ये सात कामांवर १११,अंबरनाथच्या सात कामांवर १६८, मुरबाडच्या ३८ कामांवर सर्वाधिक एक हजार २१० मजूर कार्यरत आहेत.