शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

वर्षभरात एसीबीच्या जाळ्यात १२ अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:26 IST

लाच मागितल्या प्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने चालू वर्षात १२ कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये महावितरण, पालिका, सिडको व इतर शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : लाच मागितल्या प्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने चालू वर्षात १२ कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये महावितरण, पालिका, सिडको व इतर शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, अवघ्या तिघांना शिक्षा झालेली असल्याने लाच स्वीकारल्याचे गुन्हे न्यायालयात सिद्ध करण्यात एसीबीच्या अधिकाऱ्यांपुढे मोठे आव्हान निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.लाचलुचपत प्रतिबंध विभागाने यंदा प्रथमच शासकीय अधिकाऱ्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. लाच स्वीकारताना अथवा देताना कारवाई झाल्यास त्याच्या परिणामाची माहिती सर्वच शासकीय अधिकाºयांना दिली जात आहे. त्याशिवाय, कारवाईनंतर होणारी बदनामी, समाजाचा बघण्याचा बदलणारा दृष्टिकोन व कुटुंबाला होणारा मनस्ताप याची जाणीव करून दिली जात आहे. त्याद्वारे मानसिकता बदलल्यास लाच स्वीकारण्याच्या अथवा देण्याच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास नवी मुंबई एसीबीचे पोलीस उप अधीक्षक रमेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा प्रथमच सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विकासक, मोठे व्यावसायिक यांच्यात लाच टाळण्याविषयी जनजागृती केली जात आहे.मात्र एसीबीकडून केल्या जाणाºया कारवायांमध्ये संबंधिताला शिक्षा लागण्याचे प्रमाण फारच कमी आहे. बहुतांश कारवायांमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झाल्याचेही दुर्मीळ आहे. नवी मुंबई एसीबीने चालू वर्षात १२ कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये महावितरणच्या तीन, सिडको एक, पोलीस एक, रेशनिंग एक, तळोजा एक, मनपा एक, महसूल एक, राज्य विमा कार्यालय एक, रजिस्ट्रेशन कार्यालय एक व एपीएमसीच्या एका अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी अवघ्या सात कारवायांचा निकाल लागला असून, तिघांना शिक्षा लागलेली आहे. यावरून कारवायांच्या तुलनेत शिक्षेचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील बाबींमुळे तपासात निर्माण होणाºया अडचणींमुळे शिक्षा लागण्याचे प्रमाण घटत असल्याची जिल्ह्यातील एसीबीच्या कर्मचाºयांची खंत आहे. अनेकदा व्हेरिफिकेशन व त्यानंतर तक्रारदार आपला जबाब बदलतो, त्यामुळेही संबंधित अधिकारी कारवाईनंतरही शिक्षेपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे शासकीय अधिकाºयांकडून लाच स्वीकारण्याच्या गुन्ह्यांचे फारसे गांभीर्य घेतले जात नसल्याची शक्यता आहे. तर दरवर्षी होणारी जनजागृतीही व्यर्थ ठरत आहे.दक्षता जनजागृती सप्ताहांतर्गत, ‘भ्रष्टाचार संपवू या, नवा भारत घडवू या’ हे अभियान राबवले जात आहे. त्यानुसार नागरिकांसह सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यात जनजागृती केली जात आहे. लाचविरोधी कारवाईसाठी १०६४ क्रमांकाची राज्यस्तरीय हेल्पलाइन आहे. त्यावर तक्रार करणाºयाचे नाव गोपनीय ठेवून शक्य तितक्या लवकर कारवाई केली जाते; परंतु पीडितांची तक्रार करण्याची मानसिकता होत नसल्याने अनेक प्रकरणे उघडकीस येत नाहीत.- रमेश चव्हाण,पोलीस उपअधीक्षक,नवी मुंबई ला.प्र.वि.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागNavi Mumbaiनवी मुंबईCorruptionभ्रष्टाचारcidcoसिडकोmahavitaranमहावितरण