शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 22:46 IST

यावेळी पात्रा यांनी ईव्हीएमचा नवा अर्थही सांगितला, ते म्हणाले, "ईव्हीएमचा अर्थ, 'ई'पासून ऊर्जा, 'व्ही'पासून विकास आणि 'एम'पासून मेहनत. यामुळेच भारजपचा विजय होतो. काँग्रेसने आपल्या पराभवासाठी ‘आरबीएम’ला (राहुल यांचे बेकार मॅनेजमेंट) जबाबदार ठरवायला हवे." 

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) काढून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याच्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मागणीला प्रत्युत्तर देताना पात्रा यांनी काँग्रेसने मंगळावर जाऊन निवडणूक लढवावी, असा टोला लगावला आहे. एवढेच नाही तर, खर्गे यांचे वक्तव्य हास्यास्पद आणि जनतेच्या निर्णयाचा अपमान असल्याचे पात्रा यांनी म्हटले आहे.

संबित पात्रा यांचा पलटवार -मल्लिकार्जुन खर्ग यांनी ईव्हीएमसंदर्भात बोलताना नुकतेच म्हटले होते की, "यामुळे ओबीसी, एससी, एसटी आणि दुर्बल घटकांतील लोक जी मते टाकत आहेत ती वाया जात आहेत. आमचे म्हणणे आहे की, सर्व सोडा आणि बॅलेट पेपरद्वारे मतदान करा." यावर पलटवार करत संबित पात्रा म्हणाले, "या वर्गाला ईव्हीएम कसे वापरायचे हे कळत नाही, असे काँग्रेस मानते का? हा विचार त्यांचा अपमान करणारा आहे." याचवेळी खर्गे यांचा हा तर्क फेटाळून लावत, ही काँग्रेसची निराशा असल्याचेही पात्रा म्हणाले.

"मंगळावर जाऊन निवडणूक लढा" -पुढे बोलताना बोचरा हल्ला करत संबित पात्रा म्हणाले, ""खर्गे जी म्हणतात की, त्यांना ईव्हीएम, ईडी, सीबीआय आणि भारत सरकार नको आहे. असे असेल तर त्यांच्यासाठी सर्वात चांगले ठीकाण मंगळ ग्रह आहे. तेथे ना ईव्हीएम आहे ना निवडणूक आयोग. तेथे तुमच्या राजकुमाराला (राहुल गांधी) खुर्चीवर बसवा." 

पात्रांनी सांगितला ईव्हीएमचा नवा अर्थ - यावेळी पात्रा यांनी ईव्हीएमचा नवा अर्थही सांगितला, ते म्हणाले, "ईव्हीएमचा अर्थ, 'ई'पासून ऊर्जा, 'व्ही'पासून विकास आणि 'एम'पासून मेहनत. यामुळेच भारजपचा विजय होतो. काँग्रेसने आपल्या पराभवासाठी ‘आरबीएम’ला (राहुल यांचे बेकार मॅनेजमेंट) जबाबदार ठरवायला हवे." 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राBJPभाजपाEVM Machineईव्हीएम मशीनcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे