शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशन: राहुल गांधी सुट्टीवर आहेत; लोकसभा अध्यक्षांनी सभागृहात सांगितले, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 17:09 IST

तसेच राहुल गांधी यांचं नाव प्रश्नोत्तराच्या पत्रिकेत छापील होतं.

नवी दिल्ली - संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्या हजेरीचा उल्लेख करत सांगितलं की मी त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देणार होतो. मंगळवारी लोकसभेत काँग्रेसचे खासदार के.सुरेश हे राहुल गांधी यांच्या सीटवरुन बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी एलईडी स्क्रीनवर राहुल गांधी यांचे नाव पाहून लोकसभा अध्यक्षांनी के. सुरेश यांना त्यांच्या जागेवर जाण्याची सूचना केली. कारण राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते अन् त्यांचे नाव स्क्रीनवर दिसत होते. 

यावेळी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, तुमची सीट रिक्त दाखवत आहे. तुम्ही ज्या सीटवरुन बोलत आहात ती राहुल गांधी यांची सीट आहे. राहुल गांधी आज सुट्टीवर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. यावेळी भाजपा खासदार राजीव प्रताप रुडी यांनी या घटनेवर भाष्य करताना सदस्यांनी त्यांच्या जागेवरुन बोलावं अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली. कारण आपल्याला संपूर्ण देश बघत आहे, त्यामुळे टीव्ही स्क्रीनवर आपलं नावं चुकीचं जावू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सोमवारपासून राहुल गांधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊनही उपस्थित दिसले नाहीत. 

तसेच राहुल गांधी यांचं नाव प्रश्नोत्तराच्या पत्रिकेत छापील होतं. ते जर उपस्थित असते तर त्यांना बोलण्याची संधी द्यायची होती असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. लोकसभा कार्यक्रमानुसार २८ नंबरवर राहुल गांधी यांचा प्रश्न छापील होता. केरळमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनासंदर्भात ते प्रश्न विचारणार होते.  

दरम्यान, इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं. या ट्वीटरवर इंदिरा गांधींच्या आठवणींना राहुल यांनी उजाळा दिला आहे. वडील जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इंदिरा गांधी राजकारणात आल्या. त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. शास्त्री यांच्या निधनानंतर त्या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींना 1971मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती. भारतला सशक्त रुप देणाऱ्या अशा महिलेला शतश: अभिवादन आहे असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाom birlaओम बिर्ला