शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

२०२१ ची जातनिहाय जनगणना का नाही?, लवकर सुरू करा; कन्हैय्या कुमारचा मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 19:28 IST

भाजप सरकार पशू, पक्षी, महिला, पुरुष यांची संख्या मोजत आहे. मग, देशातील जाती मोजायला काय अडचण आहे.

नवी दिल्ली - बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरू करण्यात आली असून देशपातळीवर हे प्रकरण अतिशय शांत आहे. त्यामुळे, देशात जातनिहाय जनगणना सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जातनिहाय जनगणना सुरू करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. आता, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनीही जातनिहाय जनगणना अद्याप का सुरू केली नाही, असा सवाल मोदी सरकारला केला आहे. वास्तविक २०२१ मध्येच जनगणना व्हायला हवी होती, असेही कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं. 

भाजप सरकार पशू, पक्षी, महिला, पुरुष यांची संख्या मोजत आहे. मग, देशातील जाती मोजायला काय अडचण आहे. देशात दर १० वर्षांनी जनगणना होत असते, त्याचा अहवालही सरकारने सादर करायला हवा, असेही कन्हैय्या कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. तसेच, राहुल गांधींनी चोरांना चोर म्हटलं तर, यांनी तो ओबीसीचा अपमान असल्याचे सांगितले. जातीच्या नावाने मतं मिळवतील, जातीच्या नावाने विरोधी पक्षाला लक्ष्य बनवतील. पण, जातनिहाय जनगणना घेणार नाहीत, असे म्हणत कन्हैय्या कुमारने मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

सरकार ना २० हजार कोटी रुपयांच्या प्रश्नावर उत्तर देते, ना देशातील वास्तविक लोकसंख्या सांगत आहे. कारण, पंतप्रधान कधी भाषणात देशाची लोकसंख्या १४० कोटी म्हणतात, तर कधी १३५ कोटी म्हणतात. त्यामुळेच, देशातील एकूण लोकसंख्या किती, किती वाढली आणि सध्या जातनिहाय सर्वच वर्गांची परिस्थिती कशी आहे, याची माहिती उपलब्ध व्हायला हवीच. देशात दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांची संख्या किती आहे, हेही देशातील लोकांना समजायला हवं, असे म्हणत कन्हैय्या कुमार यांनी जातनिहाय जनगणना घेण्याची मागणी केलीय.  

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीNarendra Modiनरेंद्र मोदीkanhaiya kumarकन्हैय्या कुमारcongressकाँग्रेस