शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा धाक गेला कुठे?

By admin | Updated: February 14, 2015 01:07 IST

हायकोर्ट : समाजातील वाढत्या उद्दामपणावर चिंता

हायकोर्ट : समाजातील वाढत्या उद्दामपणावर चिंता

नागपूर : समाजात उद्दामपणाची पातळी वाढत असल्याने व पोलिसांचा धाक हळूहळू कमी होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चिंता व्यक्त केली आहे.
वाशीम जिल्ह्यातील रिसोड पोलीस ठाण्यात काही आरोपींनी गोंधळ घालून एका जणाला मारहाण केली होती. पोलिसांपुढेच असा प्रकार घडल्यामुळे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी व्यथित होऊन एकंदरित परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. याप्रकरणातील आरोपींनी फिर्यादीसोबत तडजोड करून एफआयआर रद्द करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अंतर्गत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने कायद्यातील तरतुदीनुसार अर्ज मंजूर केला पण, घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपी व फिर्यादीला २४ फेब्रुवारीपूर्वी वाशीम पोलीस अधीक्षक कार्यालयात ५० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. ही रक्कम न भरल्यास पोलिसांनी आरोपींना अटक करून त्याची माहिती न्यायालयाला द्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय भविष्यात अशाप्रकारचे उद्दाम वर्तन करणार नाही असे प्रतिज्ञापत्र व हमीपत्र दोन आठवड्यांत न्यायालयात सादर करण्यास आरोपींना सांगण्यात आले आहे. आरोपींना याचिकेचा खर्च म्हणून ५ हजार रुपये भरण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
आरोपींना धडा मिळावा यासाठी अशाप्रकारचे आदेश देणे आवश्यक आहे. परंतु, यानंतरही आरोपी भविष्यात गोंधळ घालणार नाही याची आम्हाला खात्री नसल्याचे मत न्यायालयाने एकूण चित्र लक्षात घेता व्यक्त केले आहे.
--------------------
काय आहे प्रकरण
८ नोव्हेंबर २०१४ रोजी अरुण मगर व इतर चौघांनी उमेश सरनाईक याला वाईन बारमध्ये मारहाण केली. यामुळे उमेश पळून पोलीस ठाण्यात आला. आरोपी लोखंडी पाईप घेऊन मोटरसायकलने पोलीस ठाण्यात पोहोचले व पोलिसांपुढे उमेशला मारहाण केली. यामुळे टेबलवरील काच फुटला. यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, १४३, १४८, १४९ व मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविला.