शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Coal Scam Case: टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीचं EDला पत्र; जाणून घ्या, काय म्हणाल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 17:37 IST

रुजिरा बॅनर्जी यांना आज म्हणजेच 1 सप्टेंबरला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते, तर अभिषेक बॅनर्जी यांना 3 सप्टेंबरला बोलावण्यात आले होते.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा यांनी एक पत्र लिहून अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.  अलीकडेच, कोळसा घोटाळाप्रकरणी, ईडीने तृणमूलचे सरचिटणीस आणि डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला समन्स जारी करून चौकशीसाठी दिल्लीत बोलावले होते. रुजिरा बॅनर्जी यांना आज म्हणजेच 1 सप्टेंबरला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते, तर अभिषेक बॅनर्जी यांना 3 सप्टेंबरला बोलावण्यात आले होते.

पत्रात रुजिरा यांनी एजन्सीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे, की त्यांनी कोलकाता येथील आपल्या निवासस्थानी येऊन चौकशी करावी. रुजिरा यांनी ईडीचे सहाय्यक संचालक सुमत प्रकाश जैन यांना हे पत्र लिहिले आहे. यात त्या म्हणाल्या, "18 ऑगस्ट 2021 रोजी आलेल्या समन्समध्ये मला 1 सप्टेंबरला नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले गेले आहे. मी दोन मुलांची आई आहे आणि सध्याच्या साथीच्या काळात एकट्याने नवी दिल्लीला प्रवास केल्यास मला आणि माझ्या मुलांना धोका निर्माण होऊ शकतो.

रुजिरा म्हणाल्या, "जर आपण मला कोलकात्यातील माझ्या निवासस्थानीच उपस्थित राहण्यास सांगाल, तर ते माझ्यासाठी सोयिस्कर होईल.  कारण आपल्या संस्थेचे कार्यालयही कोलकात्यातच आहे आणि मीही कोलकात्यातच राहते, असे रुजिरा यांनी म्हटले  आहे.

ममता बॅनर्जी यांच्या भाच्याच्या मागेही ‘ईडी’; अभिषेक यांच्या बँक खात्यांची मागवली माहिती

"याशिवाय, माझ्या मते, आपल्या तपासाचा विषय आणि कारवाईचे कथित कारणही पश्चिम बंगालशी संबंधितच आहे. आपण आपला निर्णय अवश्य कळवावा. मी आपल्याला माझ्या बाजूने संपूर्ण सहकार्याचे आश्वासन देते," असेही रुजिरा यांनी म्हटले आहे. यापूर्वी, कोळसा चोरी प्रकरणासंदर्भात सीबीआयच्या पथकाने फेब्रुवारी महिन्यातही रुजिरा यांची त्याच्या निवासस्थानीच चौकशी केली होती.

ममतांनी साधलाहोता निशाणा - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शनिवारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ईडीने पुतण्या अभिषेक बॅनर्जीला जारी केलेल्या समनवरून ममता भडकल्या आहेत. आपण यांना घाबरणार नाही, असे ममतांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर तुम्ही आम्हाला ईडीची भीती दाखवली, तर आम्हीही भाजप नेत्यांच्या विरोधात केंद्रीय एजन्सींना पुरावे पाठवू, असेही ममतांनी म्हटले आहे.

ममता म्हणाल्या, तुम्ही आमच्या विरोधात ईडीचा वापर का करत आहात, तुमच्याशी कसे लढायचे हे आम्हाला माहीत आहे, आम्हाला गुजरातचा इतिहासही माहित आहे. तुमच्या एका प्रकरणाविरोधात, आम्ही बॅग भरून प्रकरणं काढू. कोळशाच्या भ्रष्टाचारासाठी तृणमूलकडे बोट दाखवून उपयोग नाही. हे केंद्रांतर्गत आहे. याच्या मंत्र्यांचे काय? त्या भाजप नेत्यांचे काय, ज्यांनी बंगाल, आसनसोल भागातील कोळशाचा बेल्ट लुटला, असे प्रश्नही ममतांनी यावेळी उपस्थित केले.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयTrinamool Congressतृणमूल काँग्रेस