शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्याची प्रतिज्ञा करू

By admin | Updated: May 29, 2016 03:37 IST

भाजपा सरकारच्या सत्तेतील दोन वर्षांच्या काळात मोठे बदल झाले आहेत. सुशासनाची अंमलबजावणी करताना भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्याची आम्ही शपथ घेतली आहे. ज्या सर्वसामान्य

नवी दिल्ली : भाजपा सरकारच्या सत्तेतील दोन वर्षांच्या काळात मोठे बदल झाले आहेत. सुशासनाची अंमलबजावणी करताना भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्याची आम्ही शपथ घेतली आहे. ज्या सर्वसामान्य नागरिकांना गेल्या काही वर्षांत फक्त लुटण्यात आले त्यांच्यासाठी आता आशेचा नवा किरण घेऊन आम्ही आलो आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या सकारात्मक कामांना अधोरेखित करत विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. निमित्त होते सरकारच्या द्विवर्षपूर्तीचे.
काँग्रेसचे नाव न घेता त्यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधक अडवणुकीचे धोरण अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला. यातील वास्तव काय आहे, हे जाणण्याची क्षमता नागरिकांत आहे, असेही ते म्हणाले. यूपीए सरकारच्या काळातील घोटाळ्यांची आठवण करून देत मोदी म्हणाले की, मागील सरकारच्या काळातील कामाच्या तुलनेत लोक आमच्या सरकारच्या विकासकामांकडे पाहत आहेत. जोपर्यंत आम्ही गत सरकारच्या काळातील कामाचा आढावा घेत नाही तोपर्यंत आम्हाला याची जाणीव होणार नाही की, आम्ही किती मोठा टप्पा पूर्ण केला आहे.
मी आज देशातील जनतेसमोर समाधानाने उभा आहे. आमच्या कामाचे बारकाईने निरीक्षण होत असूनही आम्ही जनतेचा विश्वास आणि प्रोत्साहन मिळवू शकलो. जनतेचा आमच्यावरील विश्वास दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढत आहे. जे केवळ राजकीय कारणांसाठी आम्हाला विरोध करीत आहेत, त्यांच्याबाबत मी हे म्हणणार नाही; परंतु मी एक म्हणू शकतो की, एका बाजूला विकासवादाचा अजेंडा आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधवाद आहे. आमच्या सरकारने कोणताही निर्णय दुर्भावनायुक्त हेतूने घेतलेला नाही, हे नक्की, असेही मोदी म्हणाले.
आमचे सरकार खूप मेहनतीने काम करीत आहे आणि आम्ही केलेल्या कामातून जनतेचा विश्वासही तेवढाच मिळत आहे. देशाचे हित हेच आमचे सर्वोच्च ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करीत राहणार. हे मात्र खरे आहे की, ज्यांनी जनतेचा पैसा आपल्या खिशात घातला ते अडचणीत येतील व त्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागेल. अर्थात, ते कुणी खिशात घातले आणि केव्हा घातले, याला माझ्यालेखी काहीही महत्त्व नाही; परंतु हा जनतेचा पैसा होता आणि तो इतरत्र कुठेही जाऊ देणार नाही, असे मोदी म्हणाले.
विविध कार्यक्रम, प्रकल्पांमधून इतरत्र जाणारा पैसा वाचवून आम्ही ३६ हजार कोटी रुपयांची बचत केली आहे. ज्यांनी एकेकाळी या भ्रष्टाचाराचा मलिदा लाटला, ते मात्र दुखावले गेले आहेत. काही लोक मला म्हणतात की, तुम्ही विरोधकांशी दोन हात करून आणि खूप टीका झेलूनही काम करीतच राहता. ते मला माध्यमांशी जास्त जोडले जाण्याचा आणि संवाद साधण्याचा सल्ला देतात; परंतु मी त्यांना कसे सांगणार की, ज्यांनी ३६ हजार कोटी रुपये लुटले ते आता माझ्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यांनीच जनतेचा पैसा लुबाडला होता. आमचे यश कशात असेल तर आम्ही जनतेचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समर्पित भावनेने काम करीत आहोत.
मोदींनी दोन वर्षांत काहीही केले नाही, या काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले की, आमच्या देशातील जनता सत्य शोधून काढण्यास सक्षम आहे. विकासवाद आणि विरोधवाद याची तुलना जनता योग्य पद्धतीने करू शकते. सरकारने उचललेल्या प्रत्येक पावलाची बारकाईने तुलना करावी. देशाला निराशेच्या खाईत टाकले जाईल, असे काहीही केले जाणार नाही, याकडे गांभीर्याने पाहिले जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

तिकडे आत्महत्या, इकडे सेलिब्रेशन...
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी एकीकडे आत्महत्या करीत आहेत आणि केंद्रातील मोदी सरकार दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इंडिया गेटजवळ सेलिब्रेशन करीत आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.