शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

We are Hiring; भल्याभल्यांना मंदीचा मार, 'ही' कंपनी 9000 पदं भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 5:31 PM

Coal India Government Job : एग्झिक्युटिव्ह स्तरावरील 4,000 पदांची नियुक्ती

कोलकाता : आर्थिक मंदीचा फटका बसल्यामुळे अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. मात्र  एक अशी सरकारी कंपनी आहे की तिने बंपर नोकर भरती करण्याचे नियोजन केले आहे. कोल इंडिया असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी जवळपास 9,000 पदांची नोकर भरती करणार आहे. यामध्ये कंपनी एग्झिक्युटिव्ह स्तरावरील 4,000 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. 

सरकारी खनिज कंपनी कोल इंडिया आणि या कंपनीच्या सब्सिडियरीजद्वारे होणारी ही भरती गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठी आहे. एग्झिक्युटिव्हची नियुक्ती होल्डिंग कंपनीत होत असते. कामगार आणि टेक्निकल नोकरदारांना कंपनीच्या आठ सहाय्यक युनिट्समध्ये नियुक्त केले जाते.

गेल्या 10 वर्षांत कोल इंडिया पहिल्यांदाच इतकी मोठी भरती करत आहे. अनेक वर्षांपासून या जागांवर नोकर भरती करणे बाकी होते. गेल्या वर्षात आम्ही फक्त 1,200 जागांवर नोकर भरती केली होती, असे कोल इंडिया कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले. जगभरातील सर्वात मोठी कोळसा उत्पादन कंपनी म्हणून कोल इंडियाला ओखळले जाते. कोल इंडिया कंपनीत 2,80,000 कर्मचारी आहेत. यामध्ये जवळपास 18,000 एग्झिक्युटिव्ह पदावर आहेत.

नियुक्ती केल्या जाणाऱ्या 4,000 कर्माचाऱ्यांमधील ज्युनिअर वर्गातील 900 पदांची नियुक्ती जाहिरात आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 400 पदांची भरती कॅम्पसद्वारे आणि 100 मेडिकल ऑफिसर आदी पदासांठी नियुक्ती केली जाणार आहे. 75 पदांसाठी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, 2,200 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची निवड स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.   

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारीIndiaभारतgovernment jobs updateसरकारी नोकरी