शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पाणी बिल

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

जलप्रदाय विभाग : विभागाची जबाबदारी कुणावर?नागपूर : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. यावर महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे नियंत्रण असल्याने पाणी बिल विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीने पाठविली जातात. परंतु विभागाचे कार्यकारी अभियंता अजीजूर रहेमान ३१ जानेवारी २०१५ रोजी सेवानिवृत्त झाले असतानाही फेब्रुवारी ...


जलप्रदाय विभाग : विभागाची जबाबदारी कुणावर?
नागपूर : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. यावर महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे नियंत्रण असल्याने पाणी बिल विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीने पाठविली जातात. परंतु विभागाचे कार्यकारी अभियंता अजीजूर रहेमान ३१ जानेवारी २०१५ रोजी सेवानिवृत्त झाले असतानाही फेब्रुवारी महिन्यात त्यांच्याच स्वाक्षरीने ग्राहकांना पाणी बिल पाठविली जात आहेत.
नगरयंत्री एस.एस.गायकवाड यांच्यकडे जलप्रदाय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे लोकनिर्माण विभाग, ई-गव्हर्नन्स तसेच विविध प्रकल्पांची जबाबदारी आहे. अतिरिक्त प्रभार म्हणजे १० टक्के जबाबदारी सांभाळणे असा लावला जातो. वास्तविक जलप्रदाय विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्याची गरज आहे.
गायकवाड यांच्याकडे अनेक विभागाची जबाबदारी असल्याने त्यांना जलप्रदाय विभागाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यातच त्यांनी हृदय शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे जलप्रदाय विभागात अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
चौकट...
चार अधिकाऱ्यांची नावे चर्चेत
मनपाचे उपअभियंता दिलीप जामगडे, वासुदेव गदरे, विजय गभने व बाराहाते आदी जलप्रदाय विभागाची जबाबदारी सांभाळू शकतात. तूर्त या सर्वांकडे महत्त्वाची जबाबदारी नसल्याने त्यापैकी एकाची या विभागात बदली होणार असल्याची चर्चा आहे.