शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 4:04 PM

Rajasthan Political Crisis: वसुंधरा राजे यांनी गेहलोत सरकार किंवा सचिन पायलट यांच्यातील वादावर एकही शब्द काढलेला नाही. दोन दिवसांपूर्वीच नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हुनमान बेनीवाल यांनी राजेंवर गंभीर आरोप केले होते.

जय़पूर : राजस्थानचेकाँग्रेसने हकालपट्टी केलेले उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या बंडावेळी सत्तास्थापनेसाठी चकार शब्दही न काढणाऱ्या भाजपाच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सचिन पायलट यांचे बंड मोडून काढण्यासाठी राजे यांनीच गेहलोतांना रसद पुरविल्याचा आरोप पायलटांसह एनडीएच्या खासदारानेही केला होता. यामुळे वसुंधरा राजेंना आता बोलावे लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

वसुंधरा राजे यांनी ट्विट करून यावर वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे राज्यातील जनतेला नुकसान भोगावे लागत आहे. हे दुर्भाग्याचे असल्याचे राजे यांनी म्हटले आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा राजस्थानमध्ये कोरोनामुळे 500 हून अधिक बळी गेले आहेत, तर 28000 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. याचबरोबर राज्यातील शेती टोळधाडीमध्ये नष्ट होत आहे. महिलांविरोधातील अत्याचारांनी सीमा ओलांडली आहे. राज्यामध्ये विजेचा मोठा प्रश्न आहे. या मोठ्या यादीपैकी काहीच समस्या आहेत. सरकारला याकडे लक्ष द्यायला हवे, कधीतरी लोकांचा विचार करा, असा टोला त्यांनी लगावला आहे.  

मात्र, वसुंधरा राजे यांनी गेहलोत सरकार किंवा सचिन पायलट यांच्यातील वादावर एकही शब्द काढलेला नाही. दोन दिवसांपूर्वीच नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हुनमान बेनीवाल यांनी राजेंवर गंभीर आरोप केले होते. बेनिवास यांनी सांगितले की, वसुंधराराजेंमुळेच गेहलोत सरकारची बुडणारी नौका पुन्हा तरंगू लागली आहे. बेनिवाल यांनी या आधीही वसुंधरा राजेंवर कोमतीही भीडभाड न ठेवता आरोप केले आहेत. बेनिवाल यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक ट्विट करत भाजपाच्या दिग्गज नेत्या राजस्थानमधील काँग्रेस सरकार वाचविण्यासाठी आमदारांना फोन करत असल्याचा आरोप केला आहे. 

वसुंधरा यांचा प्रभाव एवढा आहे की, त्यांच्या सूचनेवरून पायलट यांच्या बंडखोरीच्या बाजुने असलेले आमदार पुन्हा माघारी जात आहेत. बेनिवाल यांनी #गहलोत_वसुंधरा_गठजोड़ असा हॅशटॅग करत हे आरोप केले आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या अशोक गेहलोत यांचे अल्पमतात आलेले सरकार वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. राजे यांनी काँग्रेसच्या अनेक आमदारांना स्वत: फोन करून माघारी फिरण्यास सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे बेनिवाल यांनी या ट्विटमध्ये गृह मंत्री अमित शहा, त्यांचे ऑफिस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, राजस्थान भाजपा यांना टॅग केले आहे. यामध्ये सीकर आणि नागौर जिल्ह्यातील दोन जाट आमदारांना त्यांनी पायलट यांच्यापासून दूर राहण्यास सांगितले. याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असेही बेनिवाल यांनी म्हटले होते. यावरही वसुंधरा राजे यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी

चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर

Sarkari Nokari : लेखी परीक्षेचे टेन्शन नाही! फक्त मुलाखतीवर बँकेसह या विभागांत सरकारी नोकऱ्यांची संधी

चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर

लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...

अखेर पॉझिटिव्ह बातमी आली! सीरम इन्स्टिट्यूटला मोठा दिलासा; ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी यशस्वी

हेल्थ इन्शुरन्समध्ये मोठे बदल झाले; कोरोना काळात जाणून घेणे महत्वाचे

स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार

ब्रेझा, व्हेन्यूला विसरणार; नवी एसयुव्ही Magnite पाहताच भले भले व्वा म्हणणार

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा