शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

ह्दयद्रावक! खायला अन्न अन् जगायला पैसेही नाहीत; १५ दिवस फक्त पाणी पिऊन ६ जणांचा मृत्यूशी लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 20:25 IST

सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस, प्रशासनाच्या मदतीने या सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने ग्रामसेवक आणि रेशन व्यावसायिकाविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेतती मोलमजुरी करून तिच्या ५ मुलांचा सांभाळ करत होती. परंतु लॉकडाऊनमुळे तिचा रोजगार हिरावला.मागील १५ दिवसांपासून महिला तिच्या ५ मुलांसह उपाशी आहे. घरात खाण्यासाठीही काही नाही.

अलीगडमध्ये एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी १५ दिवसांपासून भूकेने व्याकुळ असलेल्या ६ जणांच्या कुटुंबाला रेस्क्यू करण्यात आलं आहे. सामजिक संघटना हँड फॉर हेल्थ ज्यावेळी या कुटुंबाच्या घरी पोहचली तेव्हा घरातील महिला आणि ५ लहान मुलं अत्यंत बिकट अवस्थेत होते. या लोकांमध्ये बोलण्याचीही ताकद नव्हती. संघटनेच्या लोकांना पाहताच या सर्वांच्या डोळ्यातून पाणी आले.

सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस, प्रशासनाच्या मदतीने या सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने ग्रामसेवक आणि रेशन व्यावसायिकाविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. अलीगडच्या नगला मंदिर परिसरात राहणाऱ्या गुड्डा देवी हिचा पती बिजेंद्र कुमार यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. ती मोलमजुरी करून तिच्या ५ मुलांचा सांभाळ करत होती. परंतु लॉकडाऊनमुळे तिचा रोजगार हिरावला. कसंतरी या महिलेने काही दिवस घर चालवलं पण पैसे संपल्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडे पैसे मागून मुलांचे पोट भरण्याचं काम केले.

काही दिवसांनी लोकांनी मदत करण्यापासून नकार दिला. मागील १५ दिवसांपासून महिला तिच्या ५ मुलांसह उपाशी आहे. घरात खाण्यासाठीही काही नाही. केवळ पाणी पिऊन संपूर्ण कुटुंब मृत्यूशी झुंज देत आहे. गुड्डीदेवी यांच्या ५ मुलांपैकी सर्वात मोठा २० वर्षीय अजय आहे. आईची नोकरी गेल्यानंतर अजय मजुरी करून घर सांभाळत होता. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याचंही काम बंद झालं. अजयच्या कमाईनं १६ वर्षीय विजय, १३ वर्षीय अनुराधा, १० वर्षीय दीपू आणि ४ वर्षीय टीटू यांचे पालनपोषण होत होतं.

परिसरातील लोकांनी सामाजिक संघटनांना बोलावलं

अनेक दिवसांपासून गुड्डी देवी आणि तिची मुलं घराबाहेर दिसली नसल्याने लोकांनी सामाजिक संघटनांना फोन केला. संघटनेचे अध्यक्ष सुनील कुमार सदस्यांसह गुड्डी देवीच्या घरी पोहचले. त्यानंतर गुड्डी देवी आणि तिच्या मुलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. भुकेने व्याकुळ झालेल्या कुटुंबाला पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. या मुलांची अवस्था पाहिली तर त्याचा अंदाज लावता येऊ शकतो.

सरकारच्या दाव्याची पोलखोल

उत्तर प्रदेश सरकारचा दावा होता की, लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्यांना मोफत रेशन आणि मनरेगामधून काम दिलं जाईल. परंतु अलीगडमधून आलेले फोटो पाहून या दाव्याची पोलखोल होत आहे. या कुटुंबाकडे ना रेशन कार्ड आणि ना आधार कार्ड. सामाजिक संघटनांनी या कुटुंबाचे वास्तव समोर आणताच जिल्हा प्रशासन हादरलं त्यांनी तात्काळ या महिलेचे रेशन कार्ड बनवण्याचे आदेश दिले आहेत. या महिलेची कहाणी समोर आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मदत करणाऱ्यांनी गर्दी केली. सपाने या कुटुंबाला आर्थिक मदत केली तर अन्य एका संस्थेने दोन महिन्याचं रेशन कुटुंबाला देऊ केले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश