शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

आता 'या' राज्यात लोकांनी मास्क वापरला नाही, तर पोलिसांवर होणार कारवाई; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 13:32 IST

न्यायालयाने म्हटले आहे, की सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांत 50हून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. सरकारने ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेन्टचा वेग वाढवावा. तसेच, शहरांत खुली मैदाने घेऊन तेथे अस्थायी रुग्णालये तयार करून कोरोना पीडितांवर उपचाराची व्यवस्था करावी. 

प्रयागराज - उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाढत्या  कोरोना संक्रमणावर चिंता व्यक्त करत अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad high court) सरकारला  संक्रमणामुळे अधिक प्रभावित झालेल्या शहरांत पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा सल्ला दिली आहे. सरकारने दोन अथवा तीन आठवड्यांच्या पूर्ण लॉकडाउनवर विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर रस्त्यावर कुणीही व्यक्ती विना मास्क आढळल्यास पोलिसांवर अवमानना कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. (Uttar Pradesh Allahabad high court says without showing mask contempt action will be taken against police)

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

न्यायालयाने म्हटले आहे, की सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांत 50हून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. सरकारने ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेन्टचा वेग वाढवावा. तसेच, शहरांत खुली मैदाने घेऊन तेथे अस्थायी रुग्णालये तयार करून कोरोना पीडितांवर उपचाराची व्यवस्था करावी. 

कोरोनासंदर्भातील एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा तसेच न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले आहे, की नाइट कर्फ्यू अथवा कोरोना कर्फ्यू संक्रमणाचा प्रसार होऊ नये, यासाठी उचललेली छोटी पावले आहेत. याचा उपयोग केवळ नाइट पार्टी तसेच नवरात्र अथवा रमजानमधील धार्मिक गर्दी थांबवण्यासाठीच मर्यादित आहे.

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी? न्यायालयाने म्हटले आहे, की लॉकडाउन लावणे योग्य नाही. मात्र, संक्रमण ज्या पद्धतीने पसरत आहे, ते पाहता, सरकारने अधिक संक्रमण असलेल्या शहरांत लॉकडाउन लावण्यावर विचार करायला हवा. कोरोनाचे अधिक संक्रमण असलेल्या शहरांत लखनौ, कानपूर, प्रयागराज, वाराणसी आणि गोरखपूर शहरांचा समावेश आहे.

विकास लोकांसाठी, लोकच नसतील तर विकासाचा काय उपयोग -न्यायालयाने म्हटले आहे, जेव्हा महापूर येतात, तेव्हा नदीवरील बांधही ते रोखू शकत नाहीत. त्यामुळे आपल्यालाही कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. दिवसाच्या अनावश्यक वाहतुकीवरही नियंत्रण आणायला हवे. जीवन राहिले तरच त्याचा उपभोगही घेता येईल आणि अर्थव्यवस्थाही सुरळीत होईल. विकास लोकांसाठी आहे. जर लोकच राहिले नाही, तर विकासाला काय अर्थ उरेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आता डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून मोठा खुलासा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस