शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नारळाची MSP ५५ टक्क्यांनी वाढवली 

By देवेश फडके | Published: January 27, 2021 5:04 PM

नारळाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून, नारळाची किमान आधारभूत किंमत (MSP) ५५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णयनारळाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासाकिमान आधारभूत किमतीत ५५ टक्के वाढ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज (बुधवारी) पार पडलेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नारळाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून, नारळाची किमान आधारभूत किंमत (MSP) ५५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

नारळाची किमान आधारभूत किंमत वाढवण्यात आली आहे. नारळाच्या MSP मध्ये प्रतिक्विंटल ३७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ९ हजार ९६० रुपये होती. ती वाढून आता १० हजार ३३५ रुपये इतकी झाली आहे, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

किमान आधारभूत किंमत वाढवण्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे गेल्या ४० वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे, असेही जावडेकर यांनी नमूद केले. गेल्या अनेक वर्षांपासून स्वामीनाथन आयोगाने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. मात्र, मोदी सरकारने आता त्यासंदर्भात आता पावले उचलली आहेत, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकरी आणि सरकारमधील संवाद संपून प्रश्न आणखी चिघळ्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचे आम्ही कधीही म्हटलेले नाही, असे जावडेकर यांनी यावेळी सांगितले. 

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत केंद्र सरकारने ११ वेळा बैठक घेतल्या आहेत. या सगळ्या बैठका निष्फळ ठरल्या. दीड वर्षांसाठी कृषी कायद्यांना स्थगिती देण्यात येईल, अशी भूमिकाही केंद्र सरकारने घेतली. मात्र, ही ऑफर शेतकरी संघटनांनी अमान्य केली. केंद्रीय कृषी कायदे रद्द करा, या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. तर कायदे मागे घेणार नसल्याची भूमिका केंद्राने घेतली आहे.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरCentral Governmentकेंद्र सरकार