शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-आदिवासींच्या विकासाबाबत आदिवासी विकास विभागच उदासीन

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

आदिवासींच्या विकासाबाबत आदिवासी विकास विभागच उदासीन

आदिवासींच्या विकासाबाबत आदिवासी विकास विभागच उदासीन
धारणी येथे ५० कोटी निधी पडून : विकासापासून दूर ठेवण्याचा डाव

गणेश वासनिक : अमरावती
आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने मागील पाच वर्षांत उद्दिष्टपूर्तीसाठी निधी खर्च केला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. एकट्या धारणी येथील प्रकल्प कार्यालयात ५० कोटींचा निधी पडून असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे आदिवासींना विकासापासून कसे दूर ठेवले जाते याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
एकीकडे शासनाच्या अनेक विभागांनी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार निधी मिळावा, यासाठी साकडे घातले आहे. मात्र आदिवासी विकास विभागाने पाच वर्षांत निधी खर्च केला नसल्याची माहिती आहे. विभागाचा कारभार नाशिक, ठाणे, नागपूर व अमरावती येथील अप्पर आयुक्त कार्यालयामार्फत चालविला जातो. या कार्यालयांतर्गत २१ प्रकल्प कार्यालये असून एकट्या धारणी येथील प्रकल्प कार्यालयात पाच वर्षांत ५० कोटी रुपयांचा निधी अखर्चिक आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविणे आवश्यक असताना प्रकल्प अधिकारी हा निधी खर्च का करीत नाही हा संशोधनाचा विषय आहे. अमरावती येथील आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त कार्यालयाला दरवर्षी शासनाकडून ५०० कोटी रुपयांचे अनुदान मिळते. तरीदेखील योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी न करता वेळेत निधी खर्च केला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आदिवासी विकास विभागात आश्रमशाळा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, कर्ज व्यवस्था, रोजगार, मागासवर्गीय कल्याण योजना, भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजना, सामान्य शिक्षण, ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम, वीजपंप व तेलपंप वाटप, कृषी व संलग्न सेवा, फलोत्पादन, मृद व जलसंधारण, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्यव्यवसाय, वने, सामाजिक वनीकरण, सहकार, ग्रामीण विकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, विद्युत विकास, क्रीडा व युवक कल्याण अशा विविध योजना राबविल्या जातात. मात्र प्रकल्प कार्यालयाच्या अफलातून कारभारामुळे निधी वेळेत खर्च केला जात नसल्याने बहुतांश आदिवासी योजनांपासून वंचित आहेत. हीच परिस्थिती राज्यभरात असल्याचे चित्र आहे.
हा निधी अखर्चिक असल्याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रभारी प्रकल्प अधिकारी तायडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.