शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पि›त रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

By admin | Updated: July 12, 2016 00:09 IST

पि›त रेल्वे मार्गावरील नंदुरबार-सुरत रेल्वेमार्ग खचल्याने सुरतकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

पि›त रेल्वे मार्गावरील नंदुरबार-सुरत रेल्वेमार्ग खचल्याने सुरतकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

रद्द गाड्या
५९०७८ भुसावळ-सुरत पॅसेंजर, ५९०७५ सुरत-भुसावळ पॅसेंजर, ५९०७६ भुसावळ-सुरत पॅसेंजर.

सुरत-जळगाव रेल्वे मार्गावरील वळविलेल्या गाड्या
- भोपाळ-रतलाम-गोध्रा-वडोदरा-अहमदाबाद मार्गे वळविलेल्या..
१२८३४ हावडा-अहमदाबाद, १२६५६, चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, १२९०६ , हावडा-पोरबंदर, १२८३३ अहमदाबाद-हावडा, १२९३७ राजकोट-रेवा.

- सुरत-वसई रोड-कल्याण-नाशिक-जळगाव मार्गे वळविलेल्या गाड्या...
११४५३ अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्सप्रेस, १२८४४ अहमदाबाद पुरी, १८५०२ गांधीधाम-विशाखाप˜नम, १९०४५ सुरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस, १२६५५ अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेस, १७०३८ बिकानेर-सिकंदराबाद, १९०५८ वाराणसी-उधना.
रविवारी संध्याकाळी जळगाव कडून गेलेली सुरत पॅसेंजर नंदुरबार येथूनच सोमवारी सकाळी परत आली.

प्रवाशांचे हाल....
जळगाव येथून नंदुरबार, सुरतकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असते. रविवारी रात्री अचानक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सोमवारी सकाळीदेखील अनेक प्रवासी रेल्वे स्थानकावर गेले, मात्र तेथे गेल्यावर रेल्वे गाड्या रद्द असल्याची माहिती मिळाल्याने अनेक जण माघारी परतले.

बसेस्ची सोय...
रविवारी रात्री रेल्वे रद्द झाल्याने जळगाव आगारातून जादा बस सोडण्यात येऊन प्रवाशांना रवाना करण्यात आले. यासाठी मध्यरात्री दोन वाजता निवासी उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके, आगार प्रमुख एस.बी. खडसे यांनी तातडीने उपाययोजना करून रात्रीच एका बसची व्यवस्था केली. या शिवाय सोमवारी जळगाव, अमळनेर आगारातून प्रत्येकी एक व भुसावळ येथून तीन जादा बसेस् सोडण्यात आल्या.

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष वार्‍यावर....
जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू असताना आपत्ती नियंत्रण कक्षाने सतर्क राहणे गरजेचे आहे, मात्र जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात आलबेल स्थिती दिसून आली. २४ तास कर्मचारी नियुक्त असावे, असे असतानाही सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजेपासून आठ वाजे पर्यंत येथे कोणीच नव्हते. याबाबत माहिती घेतली असता संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कार्यालयीन कर्मचारी होते. त्यानंतर येणारे कर्मचारी येण्यापूर्वीच ते निघून गेल्याचा गंभीर प्रकार येथे दिसून आला. रात्री येणारे कर्मचारी सव्वा आठ- साडे आठ वाजता येतील अशी माहिती मिळाली. मात्र या दोन तासात कोणीच नसल्याने जिल्ह्यात काही आपत्ती ओढावल्यास कोठे संपर्क साधावा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. दूरध्वनी करुनही अधिकारी, कर्मचारी येथे नव्हते.