शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टॉप कमांडर झारखंडमध्ये लपला, तर साथीदार नेपाळमध्ये पळाला; नक्षल चळवळ अखेरच्या टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:11 IST

नक्षल चळवळीला मोठा धक्का; टॉप नेतृत्व कमकुवत, अनेक कमांडर ठार तर अनेकांचे आत्मसमर्पण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्षलवादाचा समूळ नाश करण्याची घोषणा केली होती. गृहमंत्र्यांच्या अल्टिमेटमला अवघे सहा दिवस बाकी असून, नक्षललविरोधी मोहिमेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांनी गेल्या वर्षभरापासून केलेल्या कारवाईमुळे नक्षलावादी संघटना अतिशय कमकुवत झाली आहे. सुरक्षा दलांच्या सततच्या कारवायांमुळे अनेक मोठे नक्षल नेते ठार झाले असून, भीतीपोटी अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळेच नक्षल चळवळ आता आपल्या सर्वात कमकुवत टप्प्यातून जात असल्याचे मानले जात आहे.

गणपती नेपाळमध्ये पळाल्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, नक्षल चळवळीचा प्रमुख चेहरा मानला जाणारा गणपती देश सोडून नेपाळमध्ये पळाल्याची माहिती आहे. तर, त्याचा जवळचा सहकारी मिशिर झारखंडमध्ये लपून बसल्याचे सांगितले जाते. सुरक्षा यंत्रणांच्या मते, या दोघांना पकडण्यात यश आले, तर नक्षल संघटनेला मोठा धक्का बसेल.

मोठा नक्षल कमांडर पापा रावचे आत्मसमर्पण

दरम्यान, बस्तरमधून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नक्षल कमांडर पापा राव हा आपल्या 18 साथीदारांसह आत्मसमर्पण करत आहे. पापा राव अनेक गंभीर प्रकरणांमध्ये सहभागी होता आणि त्याचे नाव सुरक्षा दलांच्या वॉन्टेड यादीतही होते. हे आत्मसमर्पण केवळ औपचारिक नसून, नक्षल संघटनेचे खच्चीकरण होत असल्याचे संकेत मानले जात आहेत.

सुरक्षा दलांची रणनीती बदलली

विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी कारवाईची रणनीती बदलली आहे. केवळ चकमकींवर अवलंबून न राहता गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यात आली असून, स्थानिक नागरिकांशी विश्वासाचे संबंध निर्माण केले आहेत. याशिवाय, विकास कामांनाही गती देण्यात आली आहे. या सर्व बदलांमुळे अनेक नक्षल सदस्य मुख्य प्रवाहात परत येत आहेत.

आकडेवारी काय सांगते?

सुरक्षा दलांच्या अहवालानुसार, आतापर्यंत केलेल्या कारवाईत 463 नक्षलवादी ठार, तर 1600 जणांना अटक झाली आहे. याशिवाय, सुमारे 2500 जणांनी आत्मसमर्पणही केले आहे. हे आकडे नक्षल संघटना कमजोर होत असल्याचे स्पष्ट दाखवतात.

अनेक टॉप नक्षल कमांडर ठार

कारवाईत ठार झालेल्या मोठ्या नक्षल नेत्यांमध्ये सुधाकर, हिडमा, दामोदर, विकास, सुदर्शन, अनिल, रवि, मोहन, रमेश, शंकर तसेच इतर सेंट्रल कमिटी सदस्यांचा समावेश आहे.

नक्षलवाद शेवटच्या टप्प्यात?

दंतेवाडा, नारायणपूर, बीजापूर आणि सुकमा हे जिल्हे एकेकाळी नक्षलवादाचे बालेकिल्ले मानले जात होते. मात्र आता या भागात रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या सुविधा वाढल्याने स्थानिक तरुण मुख्य प्रवाहाकडे वळत आहेत. तज्ज्ञांच्या मते, सुरक्षा दलांची सातत्यपूर्ण व अचूक कारवाई आणि सरकारची पुनर्वसन व विकास धोरणे, ही नक्षलवाद कमजोर होण्यामागे दोन मोठी कारणे आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Naxal Leaders Flee, Surrender: Naxalism in India Nearing its End

Web Summary : Crackdown weakens Naxalites; leaders flee to Nepal, Jharkhand. Top commander surrenders with aides. Security strategy shift, development aid erode Naxal influence. 463 Naxalites killed, 2500 surrendered.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीAmit Shahअमित शाहCrime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड