ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:25 IST2025-11-20T14:24:16+5:302025-11-20T14:25:44+5:30

एकाच वेळी चार मजुरांच्या मृत्यूमुळे कंपनीसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

They struggled to save their lives, but no one even knew; they brought coal for the fire to keep them warm, and... | ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…

ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्री थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोळसा जाळून झोपलेल्या चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह पनकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी-५८, साइट नंबर-२ इंडस्ट्रियल एरिया येथील एका 'ऑईल सीड्स कंपनी'च्या खोलीत आढळले. एकाच वेळी चार मजुरांच्या मृत्यूमुळे कंपनीसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

कार्बन मोनोऑक्साईडमुळे मृत्यूचा संशय

पोलिसांना घटनास्थळी असलेल्या खोलीतून एका लोखंडी परातीत जळलेला कोळसा मिळाला आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार, थंडीपासून बचावासाठी पेटवलेल्या कोळश्यातून बाहेर पडलेल्या कार्बन मोनोऑक्साईड वायूमुळे गुदमरून या सर्वांचा मृत्यू झाला असावा.

मृत मजुरांची नावे अमित वर्मा (वय ३२), संजू सिंह (वय २२), राहुल सिंह (वय २३) आणि दौड अन्सारी (वय २८) अशी आहेत. हे सर्व मूळचे देवरिया जिल्ह्यातील तरकुलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तौकलपूर गावचे रहिवासी होते.

बंद खोलीत झाली दुर्घटना

हे सर्व मजूर कंपनीत लेबर म्हणून काम करत होते. रात्री थंडीपासून वाचण्यासाठी ते कंपनीच्या आवारातील एका लहान खोलीत झोपले होते. ही खोली चारही बाजूंनी पूर्णपणे बंद होती आणि हवा आत येण्यासाठी नाममात्र जागा होती. सकाळी जेव्हा त्यांच्या साथीदारांनी खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा हे चौघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दुर्लक्षामुळे जीवघेणी ठरली थंडीची उपाययोजना

घटनास्थळी लोखंडी परातीत जळलेला कोळसा आढळला होता, ज्यावर राख साचली होती. यावरून स्पष्ट होते की, रात्री थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळसा पेटवण्यात आला होता. मात्र, बंद खोलीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे विषारी वायू तयार झाला आणि त्यामुळे त्यांचा जीव गेला. घटनेची माहिती मिळताच पनकी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि खोली सील केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस म्हणाले की, पोस्टमॉर्टम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

तज्ज्ञांकडून वारंवार इशारा

प्राथमिक तपासात कोळशाच्या विषारी वायूमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उत्तर भारतात दरवर्षी थंडीच्या दिवसांत कोळसा किंवा शेकोटी जाळून बंद खोलीत झोपल्याने अशाप्रकारे अनेक लोक आपला जीव गमावतात. तज्ज्ञ वारंवार चेतावणी देतात की, कोळसा जाळताना खोलीत पुरेशी हवा असणे आवश्यक आहे, अन्यथा ते मृत्यूचे कारण बनू शकते.

Web Title : कानपुर: बंद कमरे में गर्मी के लिए कोयला जलाने से चार मजदूरों की मौत

Web Summary : कानपुर में, एक बंद कमरे में गर्मी के लिए कोयला जलाने के बाद कार्बन मोनोऑक्साइड विषाक्तता से चार मजदूरों की मौत हो गई। देवरिया जिले के इन लोगों को उनकी कंपनी के क्वार्टर में बेहोश पाया गया। विशेषज्ञ खराब हवादार स्थानों में कोयला जलाने के खिलाफ चेतावनी देते हैं।

Web Title : Kanpur: Coal fire kills four laborers seeking warmth in closed room.

Web Summary : In Kanpur, four laborers died from carbon monoxide poisoning after burning coal for warmth in a closed room. The men, from Deoria district, were found unconscious in their company quarters. Experts warn against using coal fires in poorly ventilated spaces due to the risk of toxic fumes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.