शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

काही दिवसांत पुरेशी रोकड उपलब्ध होईल - वित्त सचिव

By admin | Updated: November 14, 2016 13:26 IST

नोटबंदीमुळे लोकांनी गोंधळून जाण्याचे कारण नसून पुढच्या काही दिवसांत सगळीकडे पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, असे वित्तसचिव शक्तिकांता दास यांनी आज सांगितले.

नवी दिल्ली, दि. 14 - पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सगळीकडे रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. बँका आणि एटीएमसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नोटबंदीमुळे लोकांनी गोंधळून जाण्याचे कारण नसून पुढच्या काही दिवसांत सगळीकडे पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, असे वित्तसचिव शक्तिकांता दास यांनी आज सांगितले. 
दिल्ली प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दास यांनी नोटबंदीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी दास म्हणाले, "पुढच्या काही दिवसांमध्ये प्रत्येक ठिकाणी पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नोटबंदीमुळे गोंधळून, घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सध्या रिझर्व्ह बँकेकडे पुरेशा प्रमाणावर रोख रक्कम उपलब्ध आहे. मात्र तिच्या वितरणामध्ये अडचणी येत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे."
यावेळी सामान्य नागरिकांच्या सोईसाठी करण्यात येत असलेल्या उपायांचीही माहिती दास यांनी दिली. "बँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा आठवड्याला 24 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच साडेचार हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेता येतील. तसेच एटीएममधून अडीच हजार रुपये काढता येतील." मात्र प्रत्येक एटीएममधून अडीच हजार रुपये काढता येणार नाहीत. असेही त्यांनी सांगितले.
 नोटबंदींमुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जुन्या नोटा 24 नोव्हेबरपर्यंत स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विमान तिकीट आणि रेल्वे तिकिटांसाठी जुन्या नोटा चालतील, अशी माहिती दास यांनी दिली. नागरिकांपर्यंत रोख रक्कम पोहोचवण्यासाठी सरकारने सर्व पर्यायांचा वापर करण्याची तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. "पोस्ट ऑफिसांना अधिकाधिक रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील नागरिकांच्या सोईसाठी ग्रामीण भागातील रोख रकमेच्या पुरवठ्यात वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बॅंक विशेष पथकात तयार करेल. तसेच नव्या नोटा देण्यासाठी एटीएमच्या रचनेत करण्यात येत असलेले तांत्रिक बदल पुढच्या काही दिवसांत पूर्ण होतील,"असे दास म्हणाले.  
घरात रोख रक्कम साठवणाऱ्या लोकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले. "अडीअडचणींसाठी भारतातील प्रत्येक कुटुंब स्वत:कडे रोख रक्कम बाळगत असते. त्यामुळे अशा लोकांना गोंधळून जाण्याची गरज नाही. अडीच लाखापर्यंत रोख रक्कम प्रत्येकाला आपल्या खात्यात जमा करता येईल." अशी माहिती त्यांनी दिली. तसेच बॅंकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांगांसाठी वेगळ्या लाइन लावण्याची व्यवस्था करण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले.