शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून भाजपाच्या महिला उमेदवाराचा केला आयटम असा उल्लेख, कमलनाथ यांची सारवासारव

By बाळकृष्ण परब | Updated: October 19, 2020 16:12 IST

Kamal nath Statement on Imrat devi : कमलनाथ यांच्या विधानावरून संपूर्ण भाजपा कमलनाथ आणि काँग्रेस यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. तर कमलनाथ यांनीही स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा बचाव केला आहे.

ठळक मुद्देआयटम हा शब्द काही वाईट अर्थाने किंवा अपमान करण्याच्या हेतूने मी वापरला नाहीमला त्यावेळी त्यांचे नाव आठवत नव्हते. तेव्हा मी म्हणालो की, त्या ज्या येथील आयटम आहेत म्हणूनआयटम या शब्दाचा वापर सर्वसामान्यपणे केला जातो. हा संसदीय वापरातील शब्द आहे

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणिपोटनिवडणुकीतील उमेदवार इमरती देवी यांचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आयटम असा उल्लेख केल्याने मोठा वाद निर्माण झालेला आहे. कमलनाथ यांच्या विधानावरून संपूर्ण भाजपा कमलनाथ आणि काँग्रेस यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. तर कमलनाथ यांनीही स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा बचाव केला आहे.आज तक या हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले की, जेव्हा लोकसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते तर आयटम नं. १. विधानसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते तर आयटम नं.१. आयटम हा शब्द काही वाईट अर्थाने किंवा अपमान करण्याच्या हेतूने मी वापरला नाही. मला त्यावेळी त्यांचे नाव आठवत नव्हते. तेव्हा मी म्हणालो की, त्या ज्या येथील आयटम आहेत म्हणून.कमलनाथ पुढे म्हणाले की, आयटम या शब्दाचा वापर सर्वसामान्यपणे केला जातो. हा संसदीय वापरातील शब्द आहे. विधानसभेतही तो वापरला जातो. जर तुम्ही कुठला कार्यक्रम पाहत असाल तर त्यातही आज माझा आयटम नंबर वन ओमकारेश्वर आहे, असा उल्लेख असतो. मग हे काय अपमान करणारे आहे का. मला असं वाटत नाही. मात्र त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सारे काही सुरू आहे. तेच त्यांचे लक्ष्य आहे. आता त्यांनी जनतेसमोर जावं आणि आपल्या पंधरा वर्षांचा आणि ७ महिन्यांच्या हिशोब द्यावा, असे आव्हानही कमलनाथ यांनी दिले.सौदेबाजी करून आणि बोली लावून यांनी सरकार स्थापन केले आहे. हे लोक मध्य प्रदेशच्या जनतेला मूर्ख समजतात. जर मी कोक प्यायचं बंद केलं तर जनतेला रोजगार मिळणार आहे का, यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे चांगला अभिनेते आहेत. त्यांनी मुंबईत जाऊन अभिनय केला पाहिजे आणि मध्य प्रदेशचं नाव पुढे आणलं पाहिजे. त्यांनी अनेक वर्षे असाच अभिनय केलाय. आता जनतेला तो समजू लागला आहे, असेही कमलनाथ म्हणाले.

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा