शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शरीफ बरळले!

By admin | Updated: October 11, 2016 05:02 IST

काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या हजारो तरुणांना दहशतवादी असे हिणवून भारत मोठीच चूक करीत आहे. आम्ही भारतातील

इस्लामाबाद : काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या हजारो तरुणांना दहशतवादी असे हिणवून भारत मोठीच चूक करीत आहे. आम्ही भारतातील काश्मिरी जनतेच्या स्वातंत्र्य लढ्याला यापुढेही पाठिंबा देत राहू, असे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये केले.पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज)च्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना नवाज शरीफ म्हणाले की, काश्मिरी जनतेच्या लढ्याला आम्ही आजपर्यंत कायम पाठिंबा दिला आहे आणि जगातील कोणतीही ताकद आम्हाला तसा पाठिंबा देण्यापासून रोखू शकत नाही, हे भारताने लक्षात ठेवायला हवे. स्वातंत्र्य लढ्यातील तरुणांना दहशतवादी म्हणून, त्यांच्यावर अत्याचार, अन्याय केला जात आहे, गोळीबार करून शेकडो तरुण, वृद्ध व लहान मुलांना ठार मारले जात आहे. तरीही भारतीय काश्मीरमधील जनतेने आपला लढा थांबवलेला नाही.उरी येथील लष्करी तळावर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी घुसून केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि त्यात मारलेले दहशतवादी तसेच पाकिस्तानी सैनिक यामुळे नवाज शरीफ अडचणीत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी गेल्या आठवड्यात संसदेचे अधिवेशन बोलावून, भारतविरोधी ठराव मंजूर करवून घेतला. सारा देश, सर्व विरोधी पक्ष आपल्यासमवेत आहेत, हे जगाला भासवण्यासाठी त्यांनी हे केले. मात्र इम्रान खान आणि त्यांचा पक्ष सातत्याने नवाज शरीफ यांच्यावर अपयशाचे आरोप करीत आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार सहभागीही झाले नव्हते.त्यामुळे त्यांना राजकीयदृष्ट्या उत्तर देण्यासाठी नवाज शरीफ यांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत इम्रान खान यांच्यावरही टीका केली. काही मंडळींना देश अपंग झाल्याचे पाहायचे आहे. पण आपण तसे अजिबात होउ देणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देत पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानातील दहशतवाद संपविण्यास आपण बांधील आहोत. देशाच्या काही भागांत विजेची तीव्र टंचाई भासत असून, ती दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)३0 आॅक्टोबर रोजी इस्लामाबाद बंद-इम्रान खान यांच्या पक्षाने नवाज शरीफ यांचा भ्रष्टाचार आणि त्यांना आलेले अपयश जनतेपुढे मांडण्यासाठी ३0 आॅक्टोबर रोजी इस्लामाबाद बंदचे आवाहन केले आहे. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी चर्चा तिथे सुरू आहे. त्यामुळे इम्रान खान यांना शह देण्यासाठी नवाज शरीफ सक्रिय झाले असून, त्यासाठीच त्यांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती.मसूदची पाठराखण, पण ‘एनएसजी’वर चर्चाबीजिंग : राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत भेटीच्या तोंडावर ‘न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप’मध्ये (एनएसजी) प्रवेश देण्याच्या संदर्भात भारताशी चर्चा करण्याची चीनने सोमवारी तयारी दर्शविली. मात्र दहशतवादविरोधी लढ्याचे कोणीही राजकारण करण्यास आपला विरोध आहे, असे सांगून ‘जैश-ए- मोहम्मद’चा प्रमुख मसूद अजहर याचा घोषित दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याचा विषय संयुक्त राष्ट्र संघात रोखून धरण्याच्या आपल्या निर्णयाचे चीनने समर्थन केले.गोव्यात होणाऱ्या ‘ब्रिक्स’ देशांच्या शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष शी याच आठवड्यात भारतात जाणार आहेत. या दौऱ्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत चीनचे उप परराष्ट्रमंत्री लि बाओडाँग यांनी ‘एनएसजी’ आणि मसूदच्या मुद्द्यावर आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली. भारताने थेट चीनचे नाव घेतले नसले तरी ४८ देशांच्या ‘एनएसजी’ गटात भारताच्या प्रवेशात चीनने खोडा घातल्याचे मानले जाते.लि यांनी असेही सांगितले की, ‘एनएसजी’मधील भारताच्या प्रवेशाच्या संदर्भात सर्व शक्यता आजमावून पाहण्यास आमची ना नाही. पण हे सर्व ‘एनएसजी’च्या प्रस्थापित नियम आणि प्रक्रियांनुसारच व्हायला हवे. नियम सर्वांनीच पाळायला हवेत, हिच चीनची सातत्याने भूमिका राहिली आहे.