शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा, ग्राहक सेवेला प्राधान्य देणार

By admin | Updated: November 11, 2014 02:33 IST

रेल्वे सुरक्षा आणि ग्राहक सेवा हा आपला प्राधान्यक्रम असेल, अशी ग्वाही सुरेश प्रभू यांनी सोमवारी रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दिली.

सुरेश प्रभू : रेल्वे मंत्रलयाचा पदभार स्वीकारला
नवी दिल्ली : रेल्वे सुरक्षा आणि ग्राहक सेवा हा आपला प्राधान्यक्रम असेल, अशी ग्वाही सुरेश प्रभू यांनी सोमवारी रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दिली. रेल्वेच्या क्षमतेचा ख:या अर्थाने उपयोग करण्यात येईल, असे प्रभू म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना प्रभू म्हणाले, भूतकाळात आम्ही रेल्वेच्या संचालनात अनेक आव्हानांचा सामना केलेला आहे. आमच्याजवळ क्षमता आहे; परंतु त्याचा योग्यरीत्या उपयोग झाला नाही. पंतप्रधानांनी रेल्वेची परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. दोन बाबींकडे आम्ही अधिक लक्ष देणार आहोत. एक ग्राहक सेवा आणि दुसरी रेल्वे सुरक्षा. कारण प्रवाशांची सुरक्षा हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.
जनतेने सरकारवर मोठा विश्वास टाकलेला आहे, असे नमूद करून प्रभू म्हणाले, रेल्वेमंत्री म्हणून मी कोणती पावले उचलणार हे येत्या काही दिवसांत दिसेल. रेल्वे हा अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे आणि रेल्वेचा विकास झाला तर आर्थिक विकास होईल.
राज्यवर्धन सिंग राठोड
राज्यवर्धन सिंग राठोड यांनीही सोमवारी माहिती व प्रसारण राज्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना राठोड म्हणाले, सत्तेवर आल्यानंतर सरकारने सर्वप्रथम देशाची अर्थव्यवस्था, प्रतिष्ठा व सुरक्षा परत रुळावर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत. अरुणजी आणि मी तुमच्यासाठी उपलब्ध होण्याचा आणि दुतर्फा संवाद साधण्याचा प्रय} करू. (वृत्तसंस्था)
 
4माहिती व प्रसारण हे अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्रलय असून सरकार व मंत्र्यांच्या माहितीचे आदानप्रदान याचद्वारे होत असते, असे अरुण जेटली म्हणाले. 
4जेटली यांनी प्रकाश जावडेकर यांच्याकडून या मंत्रलयाचा कार्यभार हाती घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 
4मी यापूर्वीही या खात्याचा मंत्री होतो. त्यावेळी इलेक्ट्रॉनिकपेक्षा प्रिंट मीडियाचा प्रभाव होता. आज डिजिटल माध्यमांचा विस्तार झाला आहे.
 
देशाची सुरक्षा बळकट करण्यासाठी प्रयत्नशील
4शेजारी देशांसोबतचे संबंध हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. देशाची सुरक्षा बळकट बनविण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील आणि शत्रूविरुद्ध आम्ही संरक्षणविहिन असणार नाही, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी केले आहे.
 
4देशाच्या सुरक्षेबाबत विचारले असता र्पीकर म्हणाले, ‘मी आज माध्यमांपुढे सुरक्षाविहिन आहे; परंतु शत्रूविरुद्ध आम्ही कधीही सुरक्षाविहिन असणार नाही. मी संरक्षणमंत्री बनल्याचे मला रविवारी रात्री 11.35 वाजता कळले. मला थोडा वेळ द्या. या मंत्रलयात रुळायला मला वेळ लागेल. 
 
 सशस्त्र दलांच्या बळकटीसाठी कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याकडे आपण अधिक लक्ष देणार असल्याचे म्हणाले.