शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

एअरस्ट्राइकचा परिणाम! सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 9:20 PM

 पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअर स्ट्राइक करून बदला घेतला होता.

नवी दिल्ली -  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअर स्ट्राइक करून बदला घेतला होता. दरम्यान, बालाकोट येथील एअर स्ट्राइकमुळे दहशतवादी कारवायांना चांगलाच आळा बसला असून, सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट झाली असल्याचे केंद्र सरकारकडून आज लोकसभेत सांगण्यात आले. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत लोकसभेत माहिती दिली. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. तसेच एअर स्ट्राइकनंतर घुसखोरीमध्ये 43 टक्क्यांनी घट झाली आहे,'' असे त्यांनी सांगितले. एका दिवसापूर्वीच भारताच्या कारवाईमुळे धास्तावलेल्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून अफगाणिस्तानच्या सीमेमध्ये कूच केल्याचे वृत्त आले होते. जम्मू काश्मीरमधील घुसखोरीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मंगळवारी लोकसभेत  उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने हल्ला करून दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. तसेच संरक्षण दलांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये गेल्यावर्षीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारने सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीबाबत झीरो टॉलरेन्सचे धोरण अवलंबलेले आहे. एवढेच नाही केंद्र सरकार राज्य सरकारसोबत मिळून घुसखोरी रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारतHome Ministryगृह मंत्रालयPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद