शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 01:23 PM2021-03-06T13:23:26+5:302021-03-06T13:24:50+5:30

वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत.

rakesh tikait says fight against farm laws will continue until solution on 100 days of farmers protest | शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्णवादग्रस्त कृषी कायद्यांवर अद्यापही तोडगा नाहीशेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

नवी दिल्ली : वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विटही केले आहे. (rakesh tikait says fight against farm laws will continue until solution on 100 days of farmers protest)

०६ मार्च २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने काळे झेंडे दाखवणे आणि केएमपी एक्स्प्रेस वे जाम करण्याचा निर्धार शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाच्या १०० व्या दिवशी सकाळी राकेश टिकैत यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये एक फोटो शेअर करण्यात आला असून, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबाबत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत. 

शेवटपर्यंत संघर्ष करत राहणार

शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस.. तोडगा निघेपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहणार.. लढणार आणि जिंकणार, असे ट्विट शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत देशभरातील विविध राज्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. यावेळी स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचयातींना संबोधित करून देशभरातून शेतकरी आंदोलनाला अधिकाधिक पाठिंबा मिळावा, यासाठी राकेश टिकैत प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. 

कोरोना लस सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा; निवडणूक आयोगाचे निर्देश

दरम्यान, केंद्रीय कृषी कायदे शेती आणि शेतकरी विरोधी असून, ते मागे घ्यावे, या मागणीवर शेतकरी अद्यापही ठाम आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र, अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांनी सुधारणा सुचवाव्यात, त्यात आवश्यक बदल करू. मात्र, कृषी कायदे मागे घेणार नाही, यावर केंद्र सरकार ठाम असल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: rakesh tikait says fight against farm laws will continue until solution on 100 days of farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.