शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा अधिवेशनाचे सूप वाजले, २५ विधेयके केली मंजूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 03:33 IST

इतिहासात पहिल्यांदाच घडल्या काही गोष्टी -व्यंकय्या नायडू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यसभेचे सत्र ठरलेल्या अवधीच्या आठ दिवस आधीच गुंडाळण्यात आले. या कमी अवधीच्या सत्रात तब्बल २५ विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.

या सत्रामध्ये कृषी विधेयकांवरून विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेयक शेतकरीविरोधी आणि काही ठराविक व्यापाऱ्यांच्या हिताचे असल्याचे आरोप करण्यात आले होते. गोंधळ घालून उपसभापतींचा माईक तोडण्याचा प्रयत्न करण्याच्या कारणावरून सभापती नायडू यांनी ८ सदस्यांना सत्र संपेपर्यंत निलंबित केले. त्यात विरोधी पक्षातील सदस्यांचा समावेश होता.कामकाजावरील बहिष्कार खेदजनकविरोधी सदस्यांनी दोन दिवसांपासून कामकाजावर बहिष्कार टाकला. याबाबत नायडू यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, अधिवेशन घेणे हे कायद्यानुसार बंधनकारक होते. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रातील लोक काम करीत असताना खासदारांवर जी जबाबदारी आहे ती पूर्ण पाडायला पाहिजे, असेही चर्चेत सांगितले होते. उपसभापतींना पदावरून हटवा, अशी मागणीही राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदा झाली आहे. मी ही सूचना तात्काळ फेटाळली, कारण ही बाब नियमांना अनुरूप नव्हती.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा