शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधी शुक्रवारपासून करणार निवडणुकीचा प्रचार, २८ ला पहिला टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 3:25 AM

काँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल. त्यात काँग्रेसच्या २१ उमेदवारांचे भवितव्य ठरेल.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल.

शीलेश शर्मानवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपल्या आघाडीतील मित्रपक्षांसोबत उत्साहाने प्रचार करीत आहे कारण बिहारचे मतदार यावेळी बदल घडवतील, अशी त्याला खात्री आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल. त्यात काँग्रेसच्या २१ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. शकील अहमद यांना वाटते की, पहिल्या टप्प्यातच काँग्रेस पुढे असेल. २१ पैकी किमान १५ उमेदवार जिंकून येतील.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबरला आहे. त्यात काँग्रेसचे २४ उमेदवार आहेत. त्यातील १६ जण निवडून येतील, असा पक्षाचा अंदाज आहे. शेवटच्या टप्प्याचे मतदान ७ नोव्हेंबरला असून त्या दिवशी काँग्रेसच्या २५ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. या टप्प्यातही १६ उमेदवार जिंकतील, असे त्याला वाटते.

काँग्रेसच्या या आशेचा पाया हा नितीशकुमार सरकारचे अपयश आणि अमित शहा यांची चुकीची निवडणूक धोरणे आहेत. या परिस्थितीचा काँग्रेस आणि महा गठबंधन पूर्ण लाभ प्रचारात घेत आहेत. भाजपच्या दुहेरी राजकारणाचा व्यापक परिणाम होत असल्याचे ते लोकांना सांगत आहेत. काँग्रेस, डावेपक्ष आणि राजदच्या जोरदार प्रचाराने भाजप आणि नितीश घाबरले असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका राज्यसभा सदस्याने चर्चेत म्हटले की, लोजपसोबत भाजपने जो खेळ खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भाजप आणि नितीशकुमार यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

मतदारांमध्ये मोठा संभ्रम -काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले की, रामविलास पासवान यांच्या निधनानंतर भाजपने ज्या प्रकारे लोजपसोबत पडद्याआड गठबंधन केले त्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे नितीशकुमार भाजपच्या रणनीतीवरून साशंक आहेत. त्यांच्या शंकेचे मोठे कारण निवडणुकीनंतर भाजप आणि लोजपशी हात मिळवणी आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारcongressकाँग्रेस