शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीतून उतरुन विचार करा; राहुल यांचा मोदींवर निशाणा

By मोरेश्वर येरम | Updated: December 1, 2020 13:19 IST

दिल्लीच्या वेशीवर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं 'दिल्ली चलो' आंदोलन अजूनही सुरुच आहे. आंदोलक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्यावतीने आज दुपारी तीन वाजता चर्चेसाठी बोलावण्यात आलं आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणादिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुचमोदी सरकारने अहंकार सोडून शेतकऱ्यांचा विचार करा, राहुल यांचं आवाहन

नवी दिल्ली
नव्या कृषी कायद्यांवरुन दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला असून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून ट्विटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन पंतप्रधानांना लक्ष्य करत आहेत. आज पुन्हा एकदा राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. "जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीतून उतरुन विचार करा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्या'', असं राहुल यांनी म्हटलं आहे. 

दिल्लीच्या वेशीवर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं 'दिल्ली चलो' आंदोलन अजूनही सुरुच आहे. आंदोलक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्यावतीने आज दुपारी तीन वाजता चर्चेसाठी बोलावण्यात आलं आहे. याआधी केंद्राने दिलेला शर्तीसह चर्चेचा प्रस्ताव शेतकऱ्यांना फेटाळून लावला होता. त्यानंतर आज कोणत्याही अटीविना चर्चेस तयार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

"अन्नदाते रस्त्यांवर धरणे आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे टीव्हीवर 'खोटी' भाषणं सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचं आपल्या सर्वांवर कर्ज आहे. हे कर्ज त्यांना न्याय व हक्क दिल्यानंतरच फिटेल. त्यांना झिडकारुन, काठ्यांनी मारहाण करुन आणि त्यांच्यावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून नाही. त्यामुळे जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरुन उतरुन विचार करा आणि शेतकऱ्यांचा अधिकार द्या'', असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmer strikeशेतकरी संपcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी