शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

राहुल यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी गळ, लवकरच निर्णय घेणार, राहुल गांधींंनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 06:35 IST

Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, अशी विनंती त्यांना काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी केली. यासंदर्भात आपण लवकरच निर्णय घेऊ, असे राहुल गांधी काँग्रेस कार्यकारिणीला सांगितले. 

 नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, अशी विनंती त्यांना काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी केली. यासंदर्भात आपण लवकरच निर्णय घेऊ, असे राहुल गांधी काँग्रेस कार्यकारिणीला सांगितले. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, अशी विनंती करण्याचा प्रस्ताव एकमताने  संमत करण्यात आला. काँग्रेस कार्यकारिणीच्या या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी तसेच काँग्रेसचे अन्य मान्यवर नेते उपस्थित होते. 

काही राज्यांमध्ये पक्षाच्या निराशाजनक कामगिरीचीही यावेळी बैठकीत दखल घेतली. लोकसभा निवडणुकांत जे यश मिळाले त्याबद्दल काँग्रेसमध्ये आनंदी वातावरण आहे, मात्र ज्या राज्यांत अपयश आले, त्यामागील कारणे शोधण्यासाठी राज्यनिहाय समित्या स्थापन करण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला आहे. पक्ष संघटनेतील उणिवा दूर करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन संबंधित राज्यातील पदाधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आले.

मतदारांचे मानले आभारपक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, कार्यकारिणीच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची राहुल गांधी यांनी दखल घेतली असून, ते लवकरच यासंदर्भात निर्णय घेतील. लोकशाहीच्या, राज्यघटनेच्या रक्षणासाठी मतदारांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत मतदान केले. त्याबद्दल मतदारांचे आभार मानणारा ठराव काँग्रेस कार्यकारिणीने बैठकीत संमत केला. 

‘राज्यघटनेचे संरक्षण हा प्रचारातील मध्यवर्ती मुद्दा बनला’काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रेचा आराखडा तयार केला होता. त्या यात्रांचे नेतृत्व त्यांनीच केले. त्या दोन यात्रांमुळे आपल्या देशाच्या राजकारणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले. लोकसभा निवडणुकांतही त्यांनी घणाघाती प्रचार केला. राज्यघटनेचे संरक्षण हा मुद्दा राहुल गांधी यांच्यामुळे निवडणूक प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा बनला, असे काँग्रेस कार्यकारिणीने म्हटले आहे.  

‘दशकभरातील कारभाराला जनतेने सपशेल नाकारले’लोकसभा निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या सुधारलेल्या कामगिरीचे स्वागत करताना, कार्यकारिणीने सांगितले की, लोकसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे पंतप्रधानांचा वैयक्तिक पराभव आहे, गेल्या दशकभरात पंतप्रधानांनी केलेल्या कारभाराला जनतेने सपशेल नाकारले आहे. बैठकीत मंजूर झालेल्या दुसऱ्या ठरावात, कार्यकारिणीने म्हटले की, हा निकाल म्हणजे २०१४ पासून लोकशाही आणि लोकशाही संस्थांच्या कमकुवतपणाच्या विरोधात जनतेचा निर्णय आहे. बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या अजून एक ठरावात म्हटले आहे की, देशातील लोकांना आपल्या लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी, प्रजासत्ताक राज्यघटना राखण्यासाठी आणि सामाजिक आणि आर्थिक न्यायाची प्रगती करण्यासाठी, मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याची उत्तम संधी आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी