शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 14:40 IST

Operation Sindoor, PM Modi Planning: ४५ गुप्त बैठका, अधिकाऱ्यांच्या घरात वॉर रूम... पडद्यामागे काय-काय घडलं?

Operation Sindoor, PM Modi Planning: काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ निष्पाप हिंदूंची हत्या केली. या हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान ताबडतोब देशात परतले. यासंदर्भात आता एक बाब सूत्रांच्या हवाल्याने उघड झाली आहे की, पंतप्रधानांनी पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी सौदी अरेबियामध्ये असतानाच प्लॅन आखला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियामध्येच पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत पाकिस्तानवर हल्ला करेल असा निर्णय पंतप्रधानांनी सौदी अरेबियातच घेतला होता. सूत्रांनी म्हणण्यानुसार, पंतप्रधानांनी आधीच ठरवले होते की यावेळी काहीतरी मोठा धमाका केला जायला हवा जेणेकरून पाकिस्तान आणि जगालाही स्पष्ट संदेश दिला जाईल.

४५ हून अधिक गुप्त बैठका

मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यापूर्वी ४५ हून अधिक गुप्त बैठका झाल्या. त्यात NSA, CDS आणि सैन्यदलाचे तिन्ही प्रमुख, IB आणि RAW प्रमुख सहभागी होते. पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकांपेक्षा हे वेगळे होते. या बैठका एका गुप्त ठिकाणी झाल्या. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी एक वॉर रूम उभारण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरचे रिअल टाइम मॉनिटरिंग तेथूनच केले जात होते. पंतप्रधानांना प्रत्येक क्षणी माहिती दिली जात होती. भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान भारतीय हवाई तळांवर हवाई हल्ले आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करू शकतो अशी माहिती गुप्तचर संस्थांना आधीच मिळाली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई तळांनाही लक्ष्य करण्यात आले आणि एक कडक संदेश दिला गेला.

भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी

६-७ मे च्या रात्री पाकिस्तानला मोठा दणका बसला. संपूर्ण जगाने पाहिले की भारत पाकिस्तानच्या नापाक कारस्थानांविरुद्ध आणि दहशतवादाविरुद्ध गप्प बसणार नाही. आपल्या पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर देईल. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईअंतर्गत, पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि सुमारे १०० दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला, पण भारत सक्षम राहिला. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताच्या शैलीचे कौतुक करण्यात आले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानsaudi arabiaसौदी अरेबियाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला