शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:44 IST

Parliament Winter Session: राहुल गांधी यांनी यावेळी पुन्हा एकदा महाराष्ट्र-हरियाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला.

Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशात वंदे मातरम् गीतावरील चर्चेदरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा व्होट चोरीचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय, त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता, सरकारी संस्थांवरील नियंत्रण आणि RSSच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. 

RSS सर्व संस्थांवर कब्जा करू इच्छिते

राहुल गांधी म्हणाले की, मी सरकारी संस्थांवरील RSS च्या ताब्याबद्दल बोलतोय. RSS ला समानतेच्या भावनेची अॅलर्जी आहे. राहुल गांधी यांनी दावा केला की, निवडणूक आयोग आता स्वतंत्र संस्था न राहता RSSच्या प्रभावाखाली कार्यरत आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर RSSचा कब्जा असल्याचा दावा केला. मी गडबडीचे पुरावे दिले, पण आयोगाने काहीच कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले, RSS सर्व राष्ट्रीय संस्थांवर कब्जा करू पाहते. निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून CJI ला काढले, कारण हे आयोगावर कब्जा करू इच्छितात. हे संपूर्ण आयोगावर नियंत्रण मिळवू इच्छितात. डिसेंबर 2023 मध्ये सरकारने कायदा बदलून निवडणूक आयुक्तांना इम्युनिटी दिली. सरकार निवडणूक सुधारणा करू इच्छित नाही. बिहारमध्ये SIR झाल्यानंतरही डुप्लिकेट मतदार कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मतचोरी हा सर्वात मोठा देशद्रोह

सर्वात मोठे देशद्रोही कृत्य म्हणजे मतचोरी. तुम्ही मतचोरी करता, म्हणजे भारताची कल्पनाच नष्ट करता. जे समोर बसले आहेत, ते ‘वोट चोरी’ करून राष्ट्रविरोधी काम करत आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणूक चोरली गेली. बिहारमध्ये SIRनंतर 1.2 लाख डुप्लिकेट फोटो आढळले. डुप्लिकेट मतदारांबद्दल आयोग शांत आहे. हरियाणाच्या मतदार यादीत एका ब्राझिलियन महिलेचा फोटो 22 वेळा होता. आमच्याकडे मतचोरीचे पुरावे आहेत, पण मी ते इथे दाखवणार नाही. भाजप लोकशाहीला नुकसान पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मतदार यादी निवडणुकीच्या एका महिन्यापूर्वी सर्व पक्षांना द्यावी. CCTV नष्ट करण्याचा नियम असलेला कायदाच रद्द केला पाहिजे. निवडणूक आयुक्तांना दिलेली इम्युनिटीदेखील तात्काळ काढून टाकली पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी यावेळी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Accuses RSS of Capturing Indian Institutions in Parliament

Web Summary : Rahul Gandhi alleged RSS controls institutions, including the Election Commission. He criticized electoral irregularities, demanding transparency and reforms. Gandhi claimed evidence of vote theft in Maharashtra and Haryana exists, accusing BJP of undermining democracy through the Election Commission.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग