शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या दहशतवादी नौकेची स्फोटात राख !

By admin | Updated: January 3, 2015 02:59 IST

नव्या वर्षात भारतात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानी कट सतर्क तटरक्षक दलाने तासाभराच्या थरारक मोहिमेअंती अरबी समुद्रात बुडविला.

२६/११ सारखा हल्ला टळला : तटरक्षकच्या पाठलागानंतर आत्मघातनवी दिल्ली : नव्या वर्षात भारतात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानी कट सतर्क तटरक्षक दलाने तासाभराच्या थरारक मोहिमेअंती अरबी समुद्रात बुडविला. ३१ डिसेंबरच्या उत्तररात्री शक्तिशाली स्फोटके घेऊन भारतीय सागरी हद्दीत शिरणाऱ्या संशयित पाकिस्तानी नौकेला भारतीय तटरक्षक दलाने भरसमुद्रात घेरले. गुजरातेतील पोरबंदरच्या नैऋत्येला ३६५ कि.मी. अंतरावर खोल समुद्रात संशयास्पद हालचाली करणाऱ्या पाकिस्तानी बोटीचा तटरक्षक दलाने मिट्ट काळोखात यशस्वी पाठलाग केला. आता सुटका नाही, याची जाणीव होताच त्या बोटीतील चौघांनी बोटीलाच आग लावून ती स्फोटात भस्मसात केली. त्यानंतर बोटीसह त्या चार जणांनाही जलसमाधी मिळाली.३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर देश नववर्षाच्या जल्लोषात मग्न असताना तटरक्षक दल डोळ््यांत तेल घालून सागरी सरहद्दीच्या रक्षणार्थ सज्ज होते. कराचीच्या केती बंदरातून निघालेल्या या पाकिस्तानी मच्छिमारी नौकेच्या हालचाली व हेतूंबाबतचा संशय लष्कराच्या गुप्तचरांनी व्यक्त केल्यानंतर भर समुद्रातील थरारनाट्याचा पहिला अंक रातोरात सुरू झाला. २६/११ च्या मुंबई हल्ल्यासाठी अजमल आमिर कसाब आणि त्याचे सहकारी कराचीहून समुद्रमार्गेच भारतात घुसले होते. त्याचीच तर ही पुनरावृत्ती नव्हे? अशी पाल चुकचुकताच तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान अंधार कापत आकाशात झेपावले. भारतीय हद्दीत शिरलेल्या या बोटीचा नेमका मागोवा या विमानाने घेताच तटरक्षक गस्ती नौकांचे काम सुरू झाले. वारंवार इशारा दिल्यानंतरही थांबण्याऐवजी भारतीय हद्दीच्या बाहेर जाण्यासाठी या बोटीच्या खलाशांनी वेग कमालीचा वाढविला. तटरक्षक नौकांनी तब्बल तासभर या बोटीचा थरारक पाठलाग केला. अखेर ही मच्छिमारी नौका पुरती टप्प्यात येताच इशाऱ्यादाखल भारतीय जवानांनी गोळीबारही केला. तेव्हा डेकखाली आश्रय घेणाऱ्या चौघा खलाशांनी बोटीलाच आग लावून दिली. आगीत या चौघांसह शक्तिशाली स्फोटकेही भस्मसात झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)घटनाक्रम संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार या मच्छिमारी नौकेत अंधार होता व स्फोटके लपविण्यात आली होती.कराची जवळून ही बोट आल्याचे व अरबी समुद्रात ती गैरव्यवहार करणार असल्याचा गुप्तचर सूत्रांचा अहवाल होता.संशयास्पद बोटीवर निगराणी ठेवण्यासाठी मध्यरात्री मोहीम आखण्यात आलीपोरबंदरपासून ३६५ कि.मी. अंतरावर तटरक्षक दलाने बोटीला घेरले.पाकिस्तानी बोटीला थांबण्याचा इशारा देण्यात आला, पण या बोटीने वेग वाढवून पळण्याचा प्रयत्न केला.तासभर पाठलाग केल्यानंतर इशारा देण्यासाठी गोळीबार केल्यामुळे बोट थांबलीबोटीवरील खलाशांनी बोटीला आग लावून दिली. त्यानंतर स्फोट झाला व बोट खलाशांसह बुडाली.अंधार व वादळी हवेमुळे बोट वा खलाशी याना वाचवता आले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा या महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने संपूर्ण देशात हाय अ‍ॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. २६-११ च्या मुंबईवरील हल्ल्यात कराचीहून १० पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत आले होते. त्यानी नंतर दोघा दोघांच्या जोडया केल्या व मुंबईतील सर्व प्रमुख स्थळावर हल्ले केले. या हल्ल्यात १६६ लोक मरण पावले होते. अटक व चौकशीअंती पाकच्या अंगलट येणारा विषय टाळण्यासाठीच पाक खलाशांनी मुद्देमालाला आग लावून नौकाच बुडविली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. केती बंदरातून निघालेली ही बोट अरबी समुद्रात गडबड करण्याच्या बेतात होती, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले. दोन महिन्यांपासून किनारपट्टी भागात गस्त गुप्तचर खात्याने दिलेल्या अचूक माहितीनुसार ही मध्यरात्रीची मोहीम राबविण्यात आली असे तटरक्षक दलाचे महानिरीक्षक के आर नौटियाल यानी म्हटले आहे. अंधार, वादळी हवा व जोरदार वारे यामुळे बोट व त्यावरील खलाशी यांना वाचवता आले नाही. बोटीला आग लागली व जळालेली बोट तशीच पाण्याखाली गेली.तटरक्षक दलाच्या नौका व विमाने या भागात गस्त घालत असून या बोटीवरील कोणी बचावले आहे काय याचा शोध घेतला जात आहे. तटरक्षक दल व सुरक्षा दले गेल्या दोन महिन्यांपासून किनारपट्टीच्या भागात गस्त घालत आहेत. सागरी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आल्यामुळे ही खबरदारी घेतली जात आहे. किंबहुना या सतर्कतेतूनच संभाव्य भीषण दहशतवादी हल्ला टाळण्याची कामगिरी तटरक्षक दलाने फत्ते केली.