शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 13:41 IST

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानकडून झालेले अनेक भीषण हल्ले रोखले होते. या कामात एस-४०० सह भारताची इतर सुरक्षा प्रणाली यशस्वी ठरली होती. मात्र ऑपरेशन सिंदूरमधून भारताच्या सुरक्षा यंत्रणांसाठीही काही धडे मिळाले आहेत. तसेच भविष्यातील संकटांचा विचार करून काही सुधारणा तातडीने कराव्या लागणार आहेत.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे नष्ट करून बदला घेतला होता. त्यानंतर सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षात भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानकडून होत असलेले हल्ले परतवून लावतानाच पाकिस्तानमधील महत्त्वपूर्ण हवाई तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईदरम्यान, भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानकडून झालेले अनेक भीषण हल्ले रोखले होते. या कामात एस-४०० सह भारताची इतर सुरक्षा प्रणाली यशस्वी ठरली होती. मात्र ऑपरेशन सिंदूरमधून भारताच्या सुरक्षा यंत्रणांसाठीही काही धडे मिळाले आहेत. तसेच भविष्यातील संकटांचा विचार करून काही सुधारणा तातडीने कराव्या लागणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान, घडलेल्या घडामोडी आणि झालेली हानी पाहता भारताने पाकिस्तानी सैन्यदलांवर पूर्णपणे वर्चस्व राखले हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र ऑपरेशन सिंदूरदरम्यान, युद्धाची एक वेगळीच रणनीती दिसून आली. भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर करण्यात आला. ही बाब भारतीय सुरक्ष दलांची चिंता वाढवणारी आहे.

भारताकडे सध्या हवाई संरक्षणासाठी एस-४०० ही हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली जगातील सर्वात अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे. त्याशिवाय भारताकडे स्वनिर्मित आकाश ही हवाई सुरक्षा प्रणाली आणि इतर संरक्षण यंत्रणा आहेत. मात्र ही सर्व अस्त्रे ही क्षेपणास्त्र, लढाऊ विमान आणि रॉकेट हल्ल्यांपासून बचाव करण्यास सक्षम आहेत. मात्र ड्रोन हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी भारताकडे सध्यातरी कुठलं सुरक्षा कवच नसल्याचं ऑपरेशन सिंदूरदरम्यान दिसून आलं.

आयडीआरडब्ल्यू डॉट ओरआरजी वेबसाईटमधील एका रिपोर्टनुसार सध्याची आव्हानं पाहता भारताला काऊंटर रॉकेट, आर्टिलरी  अँड मोर्टार म्हणजे सी-आरएएम प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ड्रोनसारख्या हवाई संकटांना नष्ट करता येऊ शकतं. त्यामुळे देशाच्या सीमावर्ती भागांमधील लष्करी तळांची संरक्षण व्यवस्था अधिक भरभक्कम होईल.

सी-आरएएम म्हणजे काय?सी-आरएएम ही अमेरिकन फेलेक्स आणि इस्राइली आयरन डोमसारखं एक सुरक्षा कवच आहे. हे सुरक्षा कवच कमी उंचीवरून येणाऱ्या रॉकेट, तोफा, मोर्टार आणि ड्रोनसारख्या घोकादायक वस्तूंना त्वरित पूर्णपणे नष्ट करू शकतं, अशा प्रकारे विकसित करण्यात आलेलं आहे. जगातील अनेक देशांकडे अशा प्रकारची सुरक्षा प्रणाली आहे. हमास आणि हिजबुल्लाहसोबतच्या संघर्षात इस्राइलच्या आयरन डोमने आपली ताकद दाखवून दिलेली आहे.   

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतDefenceसंरक्षण विभाग