शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 13:41 IST

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानकडून झालेले अनेक भीषण हल्ले रोखले होते. या कामात एस-४०० सह भारताची इतर सुरक्षा प्रणाली यशस्वी ठरली होती. मात्र ऑपरेशन सिंदूरमधून भारताच्या सुरक्षा यंत्रणांसाठीही काही धडे मिळाले आहेत. तसेच भविष्यातील संकटांचा विचार करून काही सुधारणा तातडीने कराव्या लागणार आहेत.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे नष्ट करून बदला घेतला होता. त्यानंतर सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षात भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानकडून होत असलेले हल्ले परतवून लावतानाच पाकिस्तानमधील महत्त्वपूर्ण हवाई तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईदरम्यान, भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानकडून झालेले अनेक भीषण हल्ले रोखले होते. या कामात एस-४०० सह भारताची इतर सुरक्षा प्रणाली यशस्वी ठरली होती. मात्र ऑपरेशन सिंदूरमधून भारताच्या सुरक्षा यंत्रणांसाठीही काही धडे मिळाले आहेत. तसेच भविष्यातील संकटांचा विचार करून काही सुधारणा तातडीने कराव्या लागणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान, घडलेल्या घडामोडी आणि झालेली हानी पाहता भारताने पाकिस्तानी सैन्यदलांवर पूर्णपणे वर्चस्व राखले हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र ऑपरेशन सिंदूरदरम्यान, युद्धाची एक वेगळीच रणनीती दिसून आली. भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर करण्यात आला. ही बाब भारतीय सुरक्ष दलांची चिंता वाढवणारी आहे.

भारताकडे सध्या हवाई संरक्षणासाठी एस-४०० ही हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली जगातील सर्वात अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे. त्याशिवाय भारताकडे स्वनिर्मित आकाश ही हवाई सुरक्षा प्रणाली आणि इतर संरक्षण यंत्रणा आहेत. मात्र ही सर्व अस्त्रे ही क्षेपणास्त्र, लढाऊ विमान आणि रॉकेट हल्ल्यांपासून बचाव करण्यास सक्षम आहेत. मात्र ड्रोन हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी भारताकडे सध्यातरी कुठलं सुरक्षा कवच नसल्याचं ऑपरेशन सिंदूरदरम्यान दिसून आलं.

आयडीआरडब्ल्यू डॉट ओरआरजी वेबसाईटमधील एका रिपोर्टनुसार सध्याची आव्हानं पाहता भारताला काऊंटर रॉकेट, आर्टिलरी  अँड मोर्टार म्हणजे सी-आरएएम प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ड्रोनसारख्या हवाई संकटांना नष्ट करता येऊ शकतं. त्यामुळे देशाच्या सीमावर्ती भागांमधील लष्करी तळांची संरक्षण व्यवस्था अधिक भरभक्कम होईल.

सी-आरएएम म्हणजे काय?सी-आरएएम ही अमेरिकन फेलेक्स आणि इस्राइली आयरन डोमसारखं एक सुरक्षा कवच आहे. हे सुरक्षा कवच कमी उंचीवरून येणाऱ्या रॉकेट, तोफा, मोर्टार आणि ड्रोनसारख्या घोकादायक वस्तूंना त्वरित पूर्णपणे नष्ट करू शकतं, अशा प्रकारे विकसित करण्यात आलेलं आहे. जगातील अनेक देशांकडे अशा प्रकारची सुरक्षा प्रणाली आहे. हमास आणि हिजबुल्लाहसोबतच्या संघर्षात इस्राइलच्या आयरन डोमने आपली ताकद दाखवून दिलेली आहे.   

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतDefenceसंरक्षण विभाग