शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 10 लाख भारतीय संकटात; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 18:34 IST

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराकमधील बगदादच्या विमानतळावर मिसाईल हल्ला करून इराणचा सर्वात मोठा लष्करी अधिकारी सुलेमानीला मारले होते. मध्य पूर्वेमध्ये जवळपास 10 लाख भारतीय नोकरीसाठी वास्तव्यास आहेत.

ठळक मुद्देअमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराकमधील बगदादच्या विमानतळावर मिसाईल हल्ला करून इराणचा सर्वात मोठा लष्करी अधिकारी सुलेमानीला मारले होते. यापुढे पाहिल्यास जवळपास 10 लाख भारतीयांचे प्राण धोक्यात आले आहेत. तीन दशकांपूर्वी जेव्हा इराकने कुवैतवर हल्ला केला होता, तेव्हा तेथील काही भारतीयांच्या मदतीने सरकारने मोठे रेस्क्यू ऑपरेशन चालविले होते.

नवी दिल्ली - अमेरिका आणि इराणमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाटोने त्यांच्या कर्मचाऱ्यांना इराकमधून सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरूवात केली आहे. इराणमध्ये आज यक्रेनच्या विमानाची दुर्घटना झाली असून अमेरिकेच्या तळांवर इराणकडून हल्ले चढविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश्य स्थिती असून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचेही बोलले जात आहे. 

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराकमधील बगदादच्या विमानतळावर मिसाईल हल्ला करून इराणचा सर्वात मोठा लष्करी अधिकारी सुलेमानीला मारले होते. यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण असून जर या दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाले तर याचा सर्वात मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. मात्र, यापुढे पाहिल्यास जवळपास 10 लाख भारतीयांचे प्राण धोक्यात आले आहेत. 

मध्य पूर्वेमध्ये जवळपास 10 लाख भारतीय नोकरीसाठी वास्तव्यास आहेत. तीन दशकांपूर्वी जेव्हा इराकने कुवैतवर हल्ला केला होता, तेव्हा तेथील काही भारतीयांच्या मदतीने सरकारने मोठे रेस्क्यू ऑपरेशन चालविले होते. यावेळी एअर इंडियाच्या विमानांनी सलग 58 दिवस नॉनस्टॉप 488 उड्डाणे करत 1.7 लाख लोकांना बाहेर काढले होते. हे जगातील आजपर्यंतचे दुसरे सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन ठरले होते. आज जर अमेरिका आणि इराणमध्ये जर युद्ध झाले तर अन्य मुस्लिम देशही इराणला मदत करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अमेरिकेच्या फौजा आखाती देशांवर हल्ला करण्यास गय करणार नाहीत. 

अमेरिकेच्या तळांवर डागली 22 क्षेपणास्रे, 80 सैनिकांचा मृत्यू, इराणचा दावा 

सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

या देशांमध्ये तब्बल 10 लाखांवर भारतीय नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना भारतात आणण्यासाठी एअर इंडियालाच नाही तर अन्य विमान कंपन्यांनाही अहोरात्र काम करावे लागेल. दीड लाख लोकांना बाहेर काढण्यासाठी जर 58 दिवस लागले असतील तर 10 लाख लोकांना बाहेर काढण्यासाठी किती वेळ आणि किती संकटांना तोंड द्यावे लागेल याचाही विचार करणेही आवाक्याबाहेरचे आहे. महत्वाचे म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र आणणे हेच जिकीरीचे ठरणार आहे. कारण युद्धकाळात काळ, वेळ पाहिला जात नाही. या लोकांना बाहेर काढण्यासाठी भारताला एवढा वेळ मिळणेही शक्य नाही. कुवैतमध्ये हे शक्य झाले होते कारण तेव्हा भारताला तेवढा वेळ मिळाला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत.

युक्रेनचं विमान इराणमध्ये कोसळलं; 180 जणांचा मृत्यू

1988 मध्ये अमेरिकेने इराणचे प्रवासी विमान पाडले होते. यामध्ये 10 भारतीयांसोबत 288 जण ठार झाले होते. आजही असेच एक विमान पाडण्यात आले आहे. तेव्हा अमेरिकेने माफीही मागितली नव्हती.  

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIndiaभारतwarयुद्ध