शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
6
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
7
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
8
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
9
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
10
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
11
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
12
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
13
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
14
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
15
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
16
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
17
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
18
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
19
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माओवाद्यांकडून एकाची हत्या; २५० जणांची सुटका

By admin | Updated: May 10, 2015 03:53 IST

माओवाद्यांचे प्राबल्य कमी करण्याच्या उद्देशाने छत्तीसगढच्या बस्तर भागांत २४ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी

रायपूर : माओवाद्यांचे प्राबल्य कमी करण्याच्या उद्देशाने छत्तीसगढच्या बस्तर भागांत २४ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात २५० हून अधिक गावकऱ्यांचे अपहरण केले असतानाच दुसरीकडे मोदी यांनी माओवाद्यांंना शस्त्रे खाली ठेवून हाती नांगर धरण्याचे आवाहन केले. दरम्यान, शनिवारी रात्री माओवाद्यांनी एका गावकऱ्याची हत्या करून सर्व गावकऱ्यांची मुक्तता केली.
मोदींचे कार्यक्रम दांतेवाडा जिल्ह्णात झाले तर त्या शेजारच्या सुकमा जिल्ह्णाच्या मोरेंगा गावातून माओवाद्यांनी गावकऱ्यांचे अपहरण केले. सर्वत्र या घटनेने खळबळ उडाली असतानाच शनिवारी रात्री माओवाद्यांनी एकाची हत्या करून उर्वरित गावकऱ्यांची मुक्तता केली. रात्री उशिरापर्यंत गावकरी आपापल्या घरी परतत होते. माओवाद्यांनी हत्या केलेल्याचा मृतदेह घेऊन नागरिक परतत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
दांतेवाडा जिल्ह्णात माओवाद्यांनी दोन दिवसांचा बंद पुकारून मोदींच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. एका पुलाचे काम करणाऱ्या गावातील मजुरांना माओवादी धमकावून आपल्यासोबत घेऊन  गेले, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र त्यांची संख्या किती याविषयी उलटसुलट माहिती मिळाली. अपहरण केलेल्यांमध्ये कोणीही महिला, मुले वा वृद्ध व्यक्ती नसल्याचे सरकारी प्रवक्ते जी. एस. मिश्रा यांनी सांगितले. सुकमाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरीश राठोड यांनी सुरुवातीस पुलाच्या बांधकामास विरोध करणाऱ्या माओवाद्यांनी ४०० ते ५०० लोकांना आपल्यासोबत जंगलात नेल्याचे सांगितले. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक डी. श्रावण म्हणाले की, माओवाद्यांनी या लोकांना ओलीस ठेवले आहे, असे नाही कारण त्यांनी कोणत्याही खंडणीची मागणी केलेली नाही. तसेच पंतप्रधानांच्या दौऱ्याशीही याचा काही संबंध नाही. गावातील आपले वर्चस्व दाखविण्यासाठी माओवादी असे करत असतात. लवकरच त्यांना सोडून दिले जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)