शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:11 IST

Odisha School Food Poisoning: ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात एका सरकारी शाळेत १०० हून अधिक विद्यार्थी अचानक आजारी पडल्याने खळबळ उडाली आहे.

Odisha School Food Poisoning: ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात एका सरकारी शाळेत १०० हून अधिक विद्यार्थी अचानक आजारी पडल्याने खळबळ उडाली आहे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली विद्यार्थिनी पाचवीत शिकत होती. खराब जेवणामुळे झालेल्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या गर्दीवर पोलिसांनी लाठीचार्जही केला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकबंध आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी जेवण केल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. हे जेवण अधिकृत मेनूचा भाग नव्हतं. पालकांनी दावा केला आहे की, मुलांना आंबवलेले तांदूळ, कुस्करलेले बटाटे आणि आंब्याची चटणी देण्यात आली होती, त्यानंतर अनेक मुलांना उलट्या आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. बाधित १०० हून अधिक विद्यार्थ्यांना सुरुवातीला जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. त्यापैकी ६७ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बारीपाडा येथील पंडित रघुनाथ मुर्मू (PRM) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

मुलांवर उपचार सुरू

इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी रूपाली बेसरा हिला सोमवारी अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आलं होतं, मात्र वैद्यकीय प्रयत्नांनंतरही मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. इतर विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून रुग्णालय आणि शाळा दोन्ही ठिकाणी वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. मयूरभंजचे जिल्हाधिकारी हेमा कांता साय यांनी सांगितलं की, ६६ विद्यार्थ्यांवर अद्याप मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत, तर इतर ४१ जण सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी विद्यार्थिनीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला असून मध्य विभागाच्या महसूल विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलिसांचा लाठीचार्ज आणि गावकऱ्यांचा संताप

विषबाधेमुळे झालेल्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या गर्दीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यामुळे लोक संतप्त झाले. जेव्हा पोलीस विद्यार्थिनीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तिच्या गावात घेऊन पोहोचले, तेव्हा परिस्थिती अधिक बिघडली. न्याय आणि अधिक नुकसान भरपाईची मागणी करत संतप्त गावकऱ्यांनी अंत्ययात्रा रोखण्याचा प्रयत्न केला. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Odisha School Food Poisoning: One Dead, 100 Students Sick

Web Summary : A student died and over 100 fell ill in Odisha after suspected food poisoning at a government school. Villagers protested, leading to a police response. An investigation is underway, and medical teams are providing treatment to affected students.
टॅग्स :OdishaओदिशाSchoolशाळाStudentविद्यार्थीfood poisoningअन्नातून विषबाधाHospitalहॉस्पिटल