नवी दिल्ली : स्वाइन फ्लू बळींचा आकडा गुरुवारी १९०० वर पोहोचला. गत २४ तासांत स्वाइन फ्लूने आणखी ३२ लोकांचा बळी घेतला. आत्तापर्यंत ३१ हजारांवर लोकांना या आजाराची बाधा झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी बळींची संख्या १८४१ होती; तर एच१एन१ची लागण झालेल्यांची संख्या ३१ हजार १५६ होती. गुरुवारी राजस्थानात गत २४ तासांत ६ रुग्णांचा मृत्यू झाला. याचसोबत राजस्थानातील स्वाइन फ्लू बळींचा आकडा ३९७वर पोहोचला. गुजरातेत आत्तापर्यंत सर्वाधिक ४०० लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात हा आकडा ३२२च्या घरात आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}