शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या अचूक नोंदणीसाठी देशभर ‘एनआरसी’ राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:32 IST

गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा; नागरिकांच्या नोंदणीशी धर्माचा संबंध नाही

नवी दिल्ली : भारतीय नागरिकांची पद्धतशीर नोंदणी करून परकीय नागरिक हुडकून काढण्याची आसाममध्ये करण्यात आली तशी ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’ची (एनआरसी) प्रक्रिया संपूर्ण देशात राबविण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.सदस्यांनी विचारलेले प्रश्न व उपस्थित केलेल्या पुरवणी मुद्द्यांना उत्तर देताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, ‘एनआरसी’चा धर्माशी काही संबंध नाही. धर्म कोणताही असला तरी जे भारतीय नागरिक आहेत त्यांची सर्वांची ‘एनआरसी’मध्ये नोंद केली जाईल. ‘एनआरसी’मध्ये धर्माच्या आधारे कोणाही नागरिकास वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेण्याची किंवा भीती बाळगण्याचे काही कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.सरकारने मांडलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि ‘एनआरसी’ या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत व त्यांचा परस्परांशी काही संबंध नाही, यावरही त्यांनी भर दिला. पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानमध्ये धर्माच्या आधारे छळ सोसाव्या लागणाऱ्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन किंवा ख्रिश्चन लोकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना भारतीय नागरिकत्व देणे सुलभ व्हावे यासाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडण्यात आले आहे.आसाममध्ये ‘एनआरसी’ राबविल्यानंतर जी अंतिम यादी ३१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली त्यात ३.११ कोटी लोकांचे दावे मान्य करून त्यांचा भारतीय नागरिक म्हणून यादीत समावेश केला गेला. ज्यांचे दावे फेटाळले गेले किंवा ज्यांनी दावेच दाखल केले नाहीत, अशा १९.०६ लाख लोकांची नावे अंतिम यादीतून वगळली गेली होती.गृहमंत्री म्हणाले की, आसामममध्ये ज्यांची नावे ‘एनआरसी’च्या अंतिम यादीत समाविष्ट झाली नाहीत त्यांचा मार्ग बंद झालेला नाही. नाव समाविष्ट करण्यासाठी ते त्यासाठी राज्यभर स्थापन केलेल्या विशेष न्यायाधिकरणांकडे दाद मागू शकतात.ममता बॅनर्जींचा ठाम नकारकोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आम्ही ‘एनआरसी’ कदापि लागू करू देणार नाही, अशी ठाम भूमिका त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.आसामनंतर आता संपूर्ण देशभर ‘एनआरसी’ राबविण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सांगितल्यानंतर लगेचच कोलकत्यापासून सुमारे २०० कि.मी. अंतरावर सागरदिघी येथील सभेत ममता बॅनर्जी यांनी ही भूमिका जाहीर केली. त्या म्हणाल्या की, ‘एनआरसी’च्या नावाखाली बंगालमध्ये धर्माच्या आधारे फूट पाडण्याचे प्रयत्न कोणालाही करू दिले जाणार नाहीत. तुमचे भारतीय नागरिकत्व कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, अशी त्यांनी उपस्थितांना ग्वाही दिली.‘एनआरसी’चा कार्यक्रम संपूर्ण देशात हाती घेण्याआधी, आसामच्या ‘एनआरसी’ यादीतून लाखो बंगाली व हिंदूंना का व कसे वगळले गेले, याचा खुलासा भाजपने करावा, असेही बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :Amit Shahअमित शहा