शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नेमाडेही संमेलनाध्यक्ष होऊ शकतात द.भि कुलकर्णींचे वक्तव्य

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST

पुणे : ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे येत्या काळात संमेलनाध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी कठोर भाषेत आपले मत मांडले असले तरीही आपण त्यांच्या शैलीत बोलावे असे अजिबात नाही. असे मत प्रसिद्ध समिक्षक डॉ. द.भि कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नमस्ते नेमाडे-नेमाडे कुठून कुठपर्यंत...? या चर्चासत्रात ते बोलत होते. प्रा. मिलींद जोशी यांनी डॉ. कुलकर्णी यांच्याशी डॉ. नेमाडे यांच्या साहित्यविषयक वाटचालीवर यावेळी चर्चा करण्यात आली. नेमाडेंचे कौतुक करत असतानाच त्यांच्यावर थेट टीका केल्याने नेमाडेंच्या ओळखीबाबत उपस्थित संभ्रमित झाले.

पुणे : ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे येत्या काळात संमेलनाध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी कठोर भाषेत आपले मत मांडले असले तरीही आपण त्यांच्या शैलीत बोलावे असे अजिबात नाही. असे मत प्रसिद्ध समिक्षक डॉ. द.भि कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नमस्ते नेमाडे-नेमाडे कुठून कुठपर्यंत...? या चर्चासत्रात ते बोलत होते. प्रा. मिलींद जोशी यांनी डॉ. कुलकर्णी यांच्याशी डॉ. नेमाडे यांच्या साहित्यविषयक वाटचालीवर यावेळी चर्चा करण्यात आली. नेमाडेंचे कौतुक करत असतानाच त्यांच्यावर थेट टीका केल्याने नेमाडेंच्या ओळखीबाबत उपस्थित संभ्रमित झाले.
डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले, कोणी भडक काही बोलत असेल तर आपणही तसेच न बोलता त्या गोष्टीचा फेरविचार करावा. वाचकाला जबरदस्त धक्का देणं हे प्रक्षुब्ध लेखकाचे काम असते. नेमाडेंनी आपल्या लेखनातून धक्कातंत्राने टीका केलेली आहे. नेमाडेंच्या कोसला ही कादंबरी गाजली असली तरीही त्यामुळे त्यांचा गौरव आणि टीका दोन्हीही झाल्याने लेखक म्हणून त्यांचे अजूनही वांडमयीन मूल्यमापन झालेले नाही. कोसलाचा काळ ५० वर्षांनी पुढे गेलेला असला तरीही कादंबरीतील तरुणाची मानसिकता आजही तीच आहे. माणूस, प्रतिभावंत आणि विचारवंत या तीने वेगळ्या भूमिका असून या तिन्ही भूमिकांमधील नेमाडे वेगळे आहेत.
कोसला ही कादंबरी नसून ती दिर्घकथा आहे. कादंबरी हा देशी प्रकार नाही तर तो पाश्चात्यांकडून आयात केलेला साहित्यप्रकार आहे. कथा हा मूळ देशी प्रकार आहे असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. नेमाडेंनी येत्या काळात नागपूर-विदर्भाचे वर्णन करावे अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.



साहित्यसंमेलन असलेच पाहीजे.
संमेलन हे उत्सवीच असले पाहीजे. उत्सवाला आपल्याकडे मूलभूत सांस्कृतिक महत्त्व आहे त्यामुळे साहित्याच्या बाबतीतही हे महत्त्व जपले गेले पाहीजे. समाजाला साहित्याभिमुख करणे यासाठीच संमेलने असतात. यावर टीका करताना डोकं दुखतं म्हणून डोकं छाटून टाकणे योग्य नाही अशी खरमरीत टीका करत नेमाडेंची व्यक्त होण्याची पद्धत मला मान्य नाही असेही डॉ. द.भि म्हणाले.

नेमाडेंवर टीका
नेमाडे यांच्यातील लेखकाचा लेखकराव झाला आहे का यावर, तसे झाले नाही पण त्यांच्या निष्ठेशी ते तडजोड करत आहेत. तसेच नेमाडे ज्ञानपीठच्या पुढील नोबेल सारख्या कोणत्या पुरस्काराची वाट पहात असतील तर या गोष्टीकडे गांभीर्याने पहायला हवे.