शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

'अच्छे दिन' आले नाहीत, आता देशाला 'सच्चे दिन' हवेत; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 9:14 PM

मोदींच्या भाषणावर काँग्रेसची जोरदार टीका

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेलं भाषण अतिशय उथळ होतं. त्यात काहीही नवं नव्हतं, अशा शब्दांमध्ये काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या कार्यकाळात अच्छे दिन आले नाहीत, आता जनतेला सच्चे दिन हवे आहेत, असा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरील भाषण अतिशय उथळ होतं. त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नव्हतं, असं सुरजेवाला पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. मोदींच्या भ्रष्टाचाराबद्दलच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'राफेल विमान खरेदी प्रकरण असो वा व्यापम घोटाळा किंवा छत्तीसगडमधील पीएएस घोटाळा, मोदी एकाही विषयावर बोलले नाहीत,' असं सुरजेवाला 'यांनी म्हटलं. डोकलाममधील चीनच्या घुसखोरीबद्दलदेखील मोदी मूग गिळून गप्प बसतात. देशामध्ये द्वेष पसरवणाऱ्या घटना घडत असतानाही मोदी गप्पच राहतात,' अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींवर तोफ डागली. 

पंतप्रधानांनी त्यांच्या लाल किल्ल्यावरील शेवटच्या भाषणात तरी खरं बोलायला हवं होतं, असा चिमटादेखील सुरजेवाला यांनी काढला. 'मोदींच्या संपूर्ण भाषणात काहीच तथ्य नव्हतं. लाल किल्ल्यावरील अखेरच्या भाषणात तरी मोदींनी खरं बोलायला हवं होतं. मोदी मन की बात करु शकत नाहीत. त्यांनी किमान काम की बात करायला हवी होती,' असं सुरजेवाला यांनी म्हटलं. देशवासीयांनी अच्छे दिनची वाट पाहणं केव्हाच सोडून दिलं आहे. आता जनतेला सच्चे दिन पाहायचे आहेत, असा टोला त्यांनी लगावला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRed Fortलाल किल्लाIndependence Dayस्वातंत्र्य दिवसcongressकाँग्रेस