शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

Citizen Amendment Bill: नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यावरुन जेडीयूत पडली फूट? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 10:13 IST

Citizen Amendment Bill : दरम्यान, जेडीयू प्रवक्ते पवनकुमार वर्मा यांनीही या विधेयकाला विरोध करत नितीश कुमारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असं सांगितले आहे.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिल्यामुळे जेडीयूत पक्षातंर्गत नाराजी नितीश कुमार यांनी निर्णयाचा फेरविचार करावा, पक्षातील नेत्यांची मागणी राज्यसभेत जेडीयू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली - लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर बुधवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. मात्र लोकसभेत जेडीयू खासदारांनी केंद्र सरकारने मांडलेल्या या विधेयकाला पाठिंबा दिल्याने पक्षातील नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने जेडीयूने मतदान केले होते. 

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरुवातीला पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी ट्विट करुन जेडीयूने या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय संविधानाला धरुन नाही असं म्हटलं होतं. त्यांच्यानंतर पवन वर्मा यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. आता राज्यसभेचे माजी खासदार गुलाम रसूल बलियावी यांनी नितीश कुमार यांना पत्र लिहून विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

या पत्रात गुलाम रसूल बलियावी यांनी लिहिलंय की, नितीश कुमार यांची प्रतिमा नेहमी अशी राहिली आहे जी चुकीचं असेल तर चूक आहे असं स्पष्ट शब्दात सांगणारी आहे. रामजन्मभूमी विवाद, तीन तलाक आणि कलम ३७० असो वा एनआरसी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. संविधानविरोधी प्रस्ताव नाकारणे, भारतातील प्रत्येक नागरिकाच्या हक्काचे संरक्षण करण्याचे समर्थन जेडीयूने केलं आहे. मात्र नितीश कुमार यांनी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला दिलेल्या पाठिंब्यामुळे अल्पसंख्याक विशेषत: मुस्लीम समाजाता अस्वस्थता आहे. त्यामुळे जेडीयूने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार केला जावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. 

दरम्यान, जेडीयू प्रवक्ते पवनकुमार वर्मा यांनीही या विधेयकाला विरोध करत नितीश कुमारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असं सांगितले आहे. राज्यसभेत हे विधेयक येईल तेव्हा या विधेयकाला पाठिंब्याबाबत त्यांनी निर्णय घ्यावा. हे विधेयक असंविधानिक आहे, देशाच्या एकतेला बाधा देणारे आहे. जेडीयू पक्षाच्या मूळ विचारधारेशी विभिन्न आहे. असं त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र सरकार आणणार आहे. यावेळी जेडीयू नेमकी काय भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक