शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 3:03 PM

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर निशाणा साधत निवडणुकीच्या निकालाचा ट्रेंड सांगितला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अदानी आणि अंबानी यांचा दाखला देत काँग्रेसवर टीका केली. विरोधक आता अदानी-अंबानी या विषयावर का बोलत नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निशाणा साधत निवडणुकीच्या निकालाचा ट्रेंड सांगितला आहे. तसेच त्यांनी मोदी यांच्या अदानी-अंबानींबद्दलच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. वेळ बदलत आहे. मित्र आता मित्र राहिला नाही, अशा शब्दांत खरगेंनी मोदींच्या विधानाचा समाचार घेतला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी लिहिले की, वेळ बदलत आहे. मित्र आता मित्र राहिला नाही. निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता पंतप्रधान आपल्याच मित्रांवर हल्ला करणारे झाले आहेत. मोदीजींची खुर्ची डगमगत असल्याचे समोर येत आहे. हा निकालांचा खरा ट्रेंड आहे. खरे तर तेलंगणामध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले होते की, पाच वर्षे राजपुत्र अदानी-अंबानींच्या माळा जपायचे, त्यांच्यावर टीका करायचे. पण जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून त्यांनी त्यांची नावे घेणे बंद केले आहे.

दरम्यान, बुधवारी तेलंगणातील करीमनगर येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला विचारले की, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून अंबानी आणि अदानी यांची नावे घेणे का थांबवले? काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी त्या उद्योगपतींकडून किती पैसे मिळाले आहेत. गेली ५ वर्षे काँग्रेसचे राजपुत्र सकाळी उठल्यापासून या उद्योगपतींच्या नावाने माळ जपत होते. पाच वर्षे एकच जपमाळ जपत होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदी आणखी म्हणाले की, निवडणुका जाहीर झाल्यापासून विरोधकांनी अंबानी आणि अदानींना शिव्या देणे बंद केले आहे. आज मला तेलंगणाच्या भूमीवरून काँग्रेसच्या राजपुत्राला विचारायचे आहे की, त्यांना अदानी आणि अंबानींकडून किती संपत्ती मिळाली? काळ्या पैशाने भरलेली पोती मिळाली का? अंबानी आणि अदानींना शिव्या देणे रातोरात थांबवले असा कोणता व्यवहार झाला? नक्कीच काहीतरी गडबड आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेGautam Adaniगौतम अदानीMukesh Ambaniमुकेश अंबानीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४