शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नेताजी सुभाषचंद्र बोस बंगालमध्ये के के भंडारींच्या नावे करत होते वास्तव्य ?

By admin | Updated: May 30, 2016 08:59 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस 1960च्या दशकात के के भंडारींच्या नावे शालुमरी आश्रममध्ये वास्तव्य करत होते का ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे

ऑनलाइन लोकमत - 
हैद्राबाद, दि. 30 - नेताजी सुभाषचंद्र बोस 1960च्या दशकात के के भंडारींच्या नावे शालुमरी आश्रममध्ये वास्तव्य करत होते का ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. 27 मे रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या काही फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या होत्या. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. 
 
एका फाईलमधील माहितीनुसार 1963मध्ये सरकारमधील उच्च अधिकारी या व्यक्तीबद्दल चर्चा करत होते. सार्वजनिक करण्यात आलेल्या एका फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख वारंवार भंडारी फाईल करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर कुठेच हा उल्लेख दिसत नाही. 
 
(नेताजी बोस सापडले होते विमान दुर्घटनेत)
 
शालुमरी आश्रमाचे सचिव रमानी रंजन दास यांनी 1963मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना सुभाषचंद्र बोस यांच्यासंबंधी एक पत्र पाठवलं होतं. त्यानंतर नेहरुंचे मुख्य खासगी सचिव के राम यांनी तात्काळ गुप्तचर विभागाचे संचालक बी एन मलिक यांना गुप्त मेमो पाठवला होता. 23 मे 1963 रोजी हे पत्र पाठवण्यात आलं होतं. ज्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता. मलिक यांनी 12 जूनला या मेमोचं उत्तर पाठवलं होतं. 
 
त्याचवर्षी पुन्हा 7 सप्टेंबरला पंतप्रधान कार्यालयाने गुप्त कागदपत्रांमध्ये के के भंडारींचा उल्लेख केला. 11 नोव्हेंबरला पुन्हा हा उल्लेख करण्यात आला. 16 नोव्हेंबरला गुप्तचर खात्याने यावर आपलं उत्तर पाठवलं होतं. 
 
सुभाषचंद्र बोस शालुमरी बाबा नसल्याचा मुखर्जी आयोगाचा निकाल - 
जस्टीस मुखर्जी आयोग 1999मध्ये गठीत करण्यात आला होता. सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्सच्या प्रती हस्तांतरित करण्यासाठी मुखर्जी आयोगाकडून दबाव टाकण्यात आला होता. मुखर्जी आयोगाकडून टाकण्यात आलेल्या दबावानंतर पंतप्रधान कार्यलयाने फाईल्सना डाऊनग्रेड करत आयोगाला उपलब्ध करुन दिल्या होत्या. 5 जुलै 2000 मध्ये अंतर्गत सचिवांनी (एनजीओ) पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे. 
 
त्यावेळी शालुमरी बाबा नेताजी असल्याच्या बातम्यांमुळे देशभरात सुभाषचंद्र बोस पुन्हा परत आल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र मुखर्जी आयोगाने नकार देत शालुमरी बाबा नेताजी सुभाषचंद्र बोस नसल्याचं सांगितलं होतं.
 
गुमनामी बाबाच होते नेताजी सुभाषचंद्र बोस?
उत्तर प्रदेशच्या फैजाबाद जिल्हा कोषागारात असलेल्या गुमनामी बाबांच्या पेटीतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांचे जुने फोटो सापडल्याने गुमनामी बाबाच प्रत्यक्षात नेताजी होते काय याबाबतचे गूढ वाढले होते. गुमनामी बाबांच्या या पेटीत नेताजींचे आई-वडील जानकीनाथ आणि प्रभावती बोस यांचेही छायाचित्र सापडले होते. गुमनामी बाबा १९८२ ते १९८५ या त्यांच्या अखेरच्या दिवसात रामभवन येथे वास्तव्याला होते. या रामभवनचे मालक शक्तिसिंग यांनी अशी छायाचित्रे मिळाली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यांनी सांगितले की, बोस कुटुंबियांच्या या छायाचित्रात नेताजींच्या आई-वडिलांशिवाय आणखी २२ सदस्य दिसतात.