शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पिढीत जनजागृतीची गरज

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

फोटो ओळी ....राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात मार्गदर्शन करताना जयंत पाटील.

फोटो ओळी ....राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात मार्गदर्शन करताना जयंत पाटील.
जयंत पाटील यांचे प्रतिपादन : राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वाभिमान सप्ताह
नागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामविकास, जलसंधारण व पर्यावरण याविषयी नवीन पिढीत जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात ते बोलत होते. शहर पक्षाचे अध्यक्ष अजय पाटील अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. दीनानाथ पडोळे उपस्थित होते.
गेल्या शतकात पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे. यातून दुष्काळ व अवकाळी पाऊ स, गारपीट अशी नैसर्गिक संकटे वाढली आहेत. पवार हे देशाचे कृषिमंत्री असताना जलसंधारणासाठी त्यांनी प्रभावी योजना राबविल्या. ग्रामविकास व पर्यावरण यांची सांगड घालण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी विविध योजना राबविल्याचे त्यांनी सागितले. शाळा-महाविद्यालयात पर्यावरण हा विषय असावा, असे अजय पाटील म्हणाले. सुभाष टाले यांनीही मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात राम गावंडे यांनी ग्रामविकासावर मार्गदर्शन केले. वनराई संस्थेने दत्तक घेतलेल्या मानेगाव येथे लोकसहभागातून कोलार नदी पात्रात २२० फुटाचा बंधारा बांधल्याची माहिती त्यांनी दिली. तिसऱ्या सत्रात उपवनरक्षक दावलवार यांनी पर्यावरण संवर्धनाची माहिती दिली. यावेळी राजेश कुंभलकर, महेंद्र भांगे, महादेवराव फुके, तनुज चौबे, प्रगती पाटील, पराग नागपुरे, योगेश मेश्राम, शरद नागदिवे, हरविंदरसिंग मुल्ला, बबीता मेहेर, प्रतिभा वासनिक, नितीन गेडाम, सुरेंद्र रामटेके, दिनकर वानखेडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन जतकर यांनी तर आभार नगरसेवक राजू नागुलवार यांनी मानले.(प्रतिनिधी)