शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

हवाई आघाडी मजबूत करण्यासाठी 200 लढाऊ विमानांची गरज

By admin | Updated: December 28, 2016 21:53 IST

देशाची हवाई आघाडी भक्कम करण्यासाठी किमान 200 लढाऊ विमानांची गरज असल्याचे मावळते हवाईदल प्रमुख अरुप राहा यांनी सांगितले

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 28 -  सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेली आगळीक आणि चीनची वाढत असलेली सैन्यशक्ती या पार्श्वभूमीवर देशाची हवाई आघाडी भक्कम करण्यासाठी किमान 200 लढाऊ विमानांची गरज असल्याचे मावळते हवाईदल प्रमुख अरुप राहा यांनी सांगितले. 
अरुप राहा हे येत्या 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी भारतील हवाई दलाच्या क्षमतेबाबत निरीक्षण नोंदवताना राहा म्हणाले, "36 राफेल विमाने ही संरक्षणासाठी पुरेशी नाहीत. तर देशाच्या सुरक्षेसाठी किमान 200 ते 250 विमानांची आवश्यकता आहे."
राहा यांनी पुढे सांगितले की,  "भारताकडे सध्या पुरेशा प्रमाणात  हेवीवेट विमाने आहेत. या गटातील  Su30 MKI  विमाने पुढील 30 ते 40 वर्षे सेवा देऊ शकतात. तसेच लाइटवेट वर्गातील विमानांचे प्रमाणही समाधानकारक आहे. सध्याच्या काळात राफेल विमाने सर्वोत्तम असून, ती बहुपयोगी आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी त्यांचा प्रभावी वापर होऊ शकतो.  पण अशी केवळ 36 विमानेच आपण मागवली आहेत. मात्र त्याहुन अधिक विमानांची गरज भारतीय हवाई दलाला आहे. 
( सैन्यात चर्चा नाही थेट कृती - अरुप राहा)